शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपीएल’ बंद केल्याने गैरसोय

By admin | Updated: September 7, 2015 04:14 IST

पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस,

आळंदी : पीएमपीएल गाड्यांची सेवा थेट आळंदीपर्यंत पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. पुणे-आळंदी रस्त्यावरील विश्रांतवाडी, कळस, बोपखेल, दिघी, वडमुखवाडी, चोविसावीवाडी, चऱ्होली, काटेवस्ती, देहू फाटा व आळंदी येथील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली बीआरटी सेवा पुणेकरांसाठी सोईची वाटत असली तरी पुणे शहराच्या विविध भागांतून आळंदीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. टप्प्याटप्प्याने उतरणाऱ्या विद्यार्थी व वृद्धांसाठी हा प्रवास जीवघेणा ठरत असल्यामुळे विद्यार्थी, त्यांचे पालक व वृद्धांकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळत असून या व इतर प्रवाशांसह आळंदीकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला हा प्रवास नकोसा वाटत आहे. बीआरटीची सेवा सुरू झाल्यापासून पुणे ते आळंदी मार्गावर ठिकठिकाणच्या टप्प्यावरील चढ-उताराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पीएमपीएलने चक्क वाऱ्यावर सोडून दिले असून आळंदी, चऱ्होली, चोविसावीवाडी, वडमुखवाडी, म्याग्झीन चौक, दिघी येथील दत्तनगर, परांडेनगर, गायकवाडनगर, विठ्ठल-रुक्मिणी चौक, जकात नाका या परिसरातील उतरणाऱ्या व चढणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आळंदी पंचक्रोशीतील सोळू, मरकळ, धानोरी, चऱ्होली, वडगाव, केळगाव व अन्य भागांतील प्रवासी आळंदी थांब्यावर येऊनच येथून पुढील प्रवास करतात. पुणे-आळंदी मार्गावरील या प्रवाशांना पुण्याहून येताना कोणत्याही गाडीत बसले तर विश्रांतवाडी येथे इच्छा नसली तरी उतरावे लागते, मग इच्छित स्थळी जाण्यासाठी दुसरी बस पकडावी लागते. या एकूण प्रवाशांपैकी कोणी विश्रांतवाडी चौकात उतरते, कोणी कळसला उतरते, कोणी दिघीला तर कोणी अन्य ठिकाणी. या एकूण प्रवासात लहान विद्यार्थी, मोठे विद्यार्थी, लहान मुली, मोठ्या मुली, कामगार महिला, नोकरदार महिला, मजूरवर्ग, पाठीवर, खांद्यावर ओझ्याचे बोचके घेऊन प्रवास करणारे लहान, तरुण, वृद्ध, महिला, पुरुष यांच्यासाठी हा प्रवास खरोखर जीवघेणा ठरू पाहत आहे. स्वारगेट, पुणे स्थानक, म. न. पा. व हडपसर येथून येताना होणाऱ्या गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. त्यात पुन्हा मध्येच विश्रांतवाडी येथे उतरावे लागत असल्यामुळे व परतीच्या प्रवासात तर त्याहून वाईट अनुभव घ्यावा लागत असल्यामुळे आळंदीकडे येताना व जाताना प्रवासी त्रस्त आहेत.(वार्ताहर)