शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

दादांचे व्यक्तिमत्त्व दीपस्तंभासारखे!- डॉ. विद्या येरवडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:11 IST

पुण्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील आदरस्थान डॉ. शां. ब. मुजुमदार शनिवारी (दि.३१) वयाच्या ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने ...

पुण्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील आदरस्थान डॉ. शां. ब. मुजुमदार शनिवारी (दि.३१) वयाच्या ८७ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्ताने त्यांची कन्या आणि सिम्बायोसिस सोसायटीच्या मुख्य संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी ‘लोकमत’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेल्या भावना...

--------------

स्वभावातील साधेपणा आणि नम्रता ही दादांची स्वभाववैशिष्ट्ये. वागण्यात बडेजाव असू नये, हे सूत्र त्यांनी स्वत: पाळले आणि आमच्यातही रुजवले आहे. प्रचंड वाचन, प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याची सवय, अभ्यासू वृत्ती आणि ध्येयाप्रती अपार निष्ठा या गुणांमुळे डॉ. शां. ब. मुजूमदार सर आदर्श व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. संस्कृती, शिक्षण आणि आरोग्य यावर त्यांचा कायम भर राहिला आहे. नातवंडे, पतवंडे यांच्याबरोबरचा वेळ माझ्या आयुष्यातील आनंदाचा काळ आहे, असे दादा नेहमी म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या ‘मी आणि सिम्बायोसिस’ या पुस्तकाचे नातवंडे आणि पतवंडाच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी असून ते आम्हा सर्वांच्या आयुष्यातील दीपस्तंभ ठरले आहेत.

सिम्बायोसिसची १९७१ साली स्थापना झाली. सुरुवातीला शिक्षणासाठी येणारे परदेशी विद्यार्थी आमच्या घरीच राहायला असत. त्यामुळे संस्थेचा विद्यार्थ्यांना फायदा झालाच; मात्र, आमच्यावरही सर्वधर्मसमभाव, सांस्कृतिक एकोपा यांचे संस्कार झाले. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही उक्ती दादांमुळे प्रत्यक्ष अनुभवता आली. स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी कुटुंबाला वेळ दिला. कोरोना काळात आई-दादा लवळेमध्ये राहायला आल्यानंतर त्यांच्या जीवनशैलीत बराच फरक पडला आहे. पूर्वी ते वाचन करत, कामे करत रात्री उशिरापर्यंत जागायचे, त्यामुळे सकाळी उठायला उशीर व्हायचा. आता ते सकाळी लवकर उठतात, चालायला जातात, व्यायाम करतात. त्यांचे वाचन प्रचंड आहे. आजही प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याची त्यांची तयारी असते. सिम्बायोसिसच्या प्रत्येक इमारतीतील स्वच्छतेवर त्यांचा जास्त भर असतो.

मुजुमदार सरांनी विकेंद्रीकरणावर कायम भर दिला आहे. विविध जबाबदा-यांवर नेमलेल्या व्यक्तींना कामाचे स्वातंत्र्य, स्वायत्तता मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे. संबंधित व्यक्तींना अधिकार दिले तरच त्यांना संस्था आपली वाटते, हा त्यांचा विचार आहे. २५:५०:२५ या फॉर्म्युल्यानुसार, २५ टक्के रक्कम पगारावर, ५० टक्के शिक्षणावर आणि २५ टक्के रक्कम भविष्यातील कामांसाठी सुरक्षित रहावी, हे गणित सरांनी कायम पाळले आहे. कोरोना काळात अनेक संस्थांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले, पदोन्नती रोखली. सिम्बायोसिसने कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले नाहीत, प्रलंबित पदोन्नतीही दिल्या. संस्थेतून चांगले विद्यार्थी आणि पर्यायाने चांगली माणसे घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाले. त्यातील ८ निकषांनुसार, सिम्बायोसिसमध्ये ८ समित्या नेमून सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्याचा दस्तावेज तयार करण्यात आला आहे. ‘सिम्बायोसिस व्हिजन २०२५’ हा दस्तावेज सरांना सादर केला जाणार आहे. शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाचा १० २ हा फॉर्म्युला ५ ३ ४ असा करण्यात आला आहे. या समीकरणावर आधारित शाळा सिम्बायोसितर्फे सुरू केली जाणार असून, या पद्धतीची ही भारतातील पहिली शाळा असेल.