शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

समाजातील सद्य: स्थिती भयावह : सतीश आळेकर; पुण्यात रंगला तन्वीर सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:23 IST

रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना शनिवारी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देविज्ञान शाखेची पार्श्वभूमी ते ललित कला केंद्राची स्थापना हा प्रवास थक्क करणारा : मुक्ता बर्वेआळेकर यांची कामाची पद्धत, जीवनमूल्यांचा अभ्यास आदी बाबींचा हेवा वाटतो : अरुण खोपकर

पुणे : सध्या नाटकांबद्दल नव्हे तर समाजातील सद्य:स्थितीचे भय वाटण्याजोगी परिस्थिती आहे. बाबरी मशीद पडल्याच्या घटनेचा रौप्यमहोत्सव साजरा केला जात आहे. ज्यांच्यामुळे कलाकाराला अभिव्यक्त होण्याची भीती वाटते, त्या शक्ती सत्तास्थानी आहेत. कलाकाराला भोवतालची भीती वाटणार नाही, असे सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असते. राज्यकर्त्यांतून असे घडत नसल्यास कलाकाराने कलेच्या माध्यमातून भयाबद्दल बोलते झाले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीकडे लक्ष वेधले.रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना शनिवारी ज्येष्ठ नाट्यसमीक्षक पुष्पा भावे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबईच्या फॅट्स थिएटरच्या फैजे जलाली यांना नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा लागू, ज्येष्ठ कलाअभ्यासक अरुण खोपकर व अभिनेत्री मुक्ता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पार पडला. आळेकर म्हणाले, ‘‘६ डिसेंबर रोजी बाबरी मशीद पडली तेव्हा कोलकाता येथे ‘घाशीराम कोतवाल’चा प्रयोग सुरू होता. १२ डिसेंबर १९७२ रोजी देशाच्या फाळणीचा रौप्यमहोत्सव साजरा होत असताना नाटकाचा प्रयोग झाला होता. उदात्तीकरणाच्या काळात नाटकातून अभिव्यक्त होण्याची नितांत गरज असते. कलाकाराने आपल्या माध्यमातून व्यक्त होऊन भोवतालच्या परिस्थितीबाबत आणि भयाबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे.’’  डॉ. श्रीराम लागू यांच्या रूपाने अभिनयाचा कायमचा अभ्यासक्रम तयार झाला आणि मानदंड प्रस्थापित झाला. नटाला नाटक प्रेक्षकसापेक्ष ठेवावे लागते. संहितेच्या पालखीचा भार नट वाहत असला तरी ती जबाबदारी लेखक, दिग्दर्शक आणि नट अशा तिघांचीही असते, असेही ते म्हणाले.मुक्ता बर्वे म्हणाल्या, ‘‘ललित कला केंद्रात सतीश आळेकर यांच्यातील शिक्षकाचे वेगळे व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळाले. अनौपचारिक नाते कायम ठेवत त्यांनी त्या वेळी दिलेला मैत्रीचा हात कायम सोबत आहे. विज्ञान शाखेची पार्श्वभूमी ते ललित कला केंद्राची स्थापना हा सरांचा प्रवास थक्क करणारा आहे. सरांनी स्वत:चे अनुयायी तयार करण्याचा प्रयत्न न करता आमच्यासाठी अवघे अवकाश खुले केले. स्वत:ची शैली आमच्यावर कधीच लादली नाही. त्यामध्ये शिकण्याचा, शिकवण्याचा अभिनिवेश कधीच जाणवला नाही. त्याच्यातील अलिप्तता, समरसता, रोजच्या जगण्यातील सादरीकरण मनाला भावते.’’अरुण खोपकर म्हणाले, ‘‘आळेकर यांची विरळ विवेकबुद्धी, कामाची पद्धत, जीवनमूल्यांचा अभ्यास आदी बाबींचा हेवा वाटतो. त्यांनी रंगभूमीवर नवरसता निर्माण केली, अत्याधुनिक तंत्राचा अभ्यास केला. धार्मिक विधीतील श्रद्धा निघून गेल्यावर कर्मकांडाचे निर्माल्य होते, हा संदेश त्यांनी ‘महानिर्वाण’ नाटकातून दिला.’’

प्रत्येक वाचनात आणि काही वर्षांनी होणाऱ्या प्रयोगामध्ये सतीश आळेकर यांची नाटके विविध आशयांसह उलगडतात. समोर आलेले जग समजावून घेऊन ते त्यापलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. घराणेपद्धती आणि अभ्यासकीय पद्धतीचा सृजनात्मक मेळ त्यांनी साधला आहे. मराठी रंगमंचावरील त्यांचा वावर अभिमानास्पद आहे.- पुष्पा भावे

टॅग्स :Puneपुणे