शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सहिष्णुतेमुळे संस्कृती टिकेल

By admin | Updated: September 14, 2015 04:44 IST

हिमालयाची उंची गाठणारी माणसे आज कुठल्याच क्षेत्रात राहिलेली नाही. फ्लॅटमध्ये दिसत नाहीत ते संस्कार दुष्काळी भागातील झोपडपट्टीत दिसतात.

पुणे : हिमालयाची उंची गाठणारी माणसे आज कुठल्याच क्षेत्रात राहिलेली नाही. फ्लॅटमध्ये दिसत नाहीत ते संस्कार दुष्काळी भागातील झोपडपट्टीत दिसतात. भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याची ताकद आणि गुण सहिष्णुतेमध्येच आहे. काळ कितीही बदलला, तरी चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, नव्या समाजाचा पाया घडविण्याची जबाबदारी ज्येष्ठांची आहे, असे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे रविवारी कविवर्य नारायण सुर्वे यांचा स्मृतिदिन आणि पुरस्कार वितरण सोहळा एस. एम. जोशी सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी निंबाळकर बोलत होते. या वेळी यशवंतराव गडाख यांचा नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी घुमान साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे होते.डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे चेअरमन डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष बाळ महाले, सभेचे अध्यक्ष उद्धव कानडे, उपाध्यक्ष मनोहर कोलते, कार्याध्यक्ष सचिन इटकर, मुख्य मानद सल्लागार महेंद्र रोकडे व्यासपीठावर होते.जन्मापासून अनेक अडचणींना सामोरे गेलेल्या सुर्वे यांच्या मनात कटूता आली कशी नाही, असा प्रश्न करून निंबाळकर म्हणाले, ‘‘वेदनेला आशेचा किरण देणारा हा कवी होऊन गेला. आज सर्व क्षेत्रांत निराशेचे वातावरण असले,तरी भारतीय संस्कृती टिकण्याविषयी चिंता करण्याचे कारण नाही.’’ डॉ. सदानंद मोरे, मधुकर भावे, उल्हास पवार, डॉ. पी. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रभाकर साळुंके (उद्योगभूषण), सुभाष कड आणि कैलास आवटे (श्रमभूषण), अशोक शीलवंत (भला माणूस), ल. म. कडू आणि प्रा. मिलिंद रथकंठीवार (साहित्य), लता ऐवळे-कदम (सनद), तानाजी वाघोले (ग्रामभूषण) यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)