शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

CoronaVirus News: ...म्हणून सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचे प्रमाण 95 टक्के; जनुकीय रचना बदलतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 1:22 AM

जनुकीय रचना बदलतेय : संसर्ग वाढला तरी मृत्यूदर, गंभीर रुग्णांचे प्रमाण कमी

प्रज्ञा केळकर-सिंगपुणे : कोणत्याही विषाणूचे जास्तीत जास्त संक्रमण झाले की, त्याची विष निर्माण करण्याची ताकद कमी होत जाते, हा सूक्ष्मजीवशास्त्राचा मूलभूत नियम आहे. कोरोना विषाणूच्या बाबतीत सध्या हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. मात्र ९५ टक्के रुग्ण लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले आहेत. विषाणूचा विषारीपणा कमी झाल्याने लक्षणे कमी प्रमाणात दिसत आहेत. मृत्यूदरही लक्षणीयरित्या कमी झाला आहे, असे मत मायक्रोबायोलिज्स्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १० फेब्रुवारीपासून झपाट्याने वाढत आहे. पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के असला तरी मृत्यूदर ०.७ टक्के इतका कमी आहे. त्याचप्रमाणे, सौम्य लक्षणे असलेल्यांचे प्रमाण ९५ टक्के आणि बरे होणाऱ्यांचे प्रमाण ९७ टक्के आहे. या स्थितीमागील कारणे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने सूक्ष्मजीवशास्त्र शाखेतील तज्ज्ञांशी संवाद साधला.

जैवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, गेल्या पंधरा दिवसांत रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूदर खूप कमी आहे. विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये अनेक बदल झाले आहेत. त्यापैकी खूप थोड्या व्हेरियंटसबद्दल बोलले जात आहे. भारतात झालेल्या दोन अभ्यासांमध्ये दिसून आले आहे की, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमधील विषाणूचे म्युटेशन  आणि गंभीर रुग्णांमधील कोरोना विषाणूचे म्युटेशन यामध्ये फरक आहे.

विषाणूचे ५०-१०० स्ट्रेन असू शकतात. युकेच्या स्ट्रेनमध्ये संसर्गदर वाढला होता, मात्र संक्रमणाची ताकद वाढली नव्हती. सध्याचा भारतातील स्ट्रेनही अशाच प्रकारचा असावा. संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे मास्क आहे. मास्कवरचा दंड दुप्पट करा, कारवाई कठोर करा, पण लॉकडाऊन नकोच.- डॉ. अरविंद देशमुख, ,अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया

विषाणू एका शरीरातून दुस-या शरीरात संक्रमण करत असताना त्याच्या जनुकीय रचनेत बदल होत असतो. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आणि विषाणूमध्ये कायम लढाई सुरू असते. एखाद्या लढाईत कोणीच जिंकत नसेल अथवा हारत नसेल तर त्यांच्या ताकदीत फरक पडत जातो. यूकेमध्ये विषाणूवरील प्रोटीनचे प्रमाण वाढल्याने त्याच्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असल्याने विषाणूची ताकद कमी होते.- डॉ. नानासोा थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, यूके

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे