शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

तपास पूर्ण झाल्यानंतर मुंडेंविषयी मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील : चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 20:46 IST

तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो.

पुणे : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळे याबाबत चर्चा करणे आता योग्य नाही असेही ते म्हणाले.पुण्यात महसूल शेती विकास महामंडळ नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग व जमाबंदी आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तपासात काही आढळून आले तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता याबाबत चर्चा करणे गरजेचे नाही. संतोष देशमुख यांच्या खुनाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही संस्थांचा योग्य तपास झाल्यानंतर राज्य सरकारला वाटले तर धनंजय मुंडे यांच्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांच्याबाबत चर्चा करणे योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीची बदनामी केली जाऊ नये. कोणालाही दोष देऊ नये. मात्र, ज्या दिवशी दोषी आढळतील, त्या दिवशी कोणालाही सोडले जाणार नाही, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे.गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जे काही लागते, ते सरकार करत आहे. गृहखाते प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे काम करत आहे. कुठल्याही व्यक्तीला वाचविण्याचे काम केले जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार हे द्वेषापोटी आणि आकसापोटी कोणावरही कारवाई करणार नाही. विरोधी पक्ष असो अथवा कुठलाही पक्ष असो, नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल. योग्य दिशेने तपास सुरू असून सरकार योग्य दिशेने काम करत आहे, असेही ते म्हणाले. आतापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याने या प्रकरणात मुंडे यांचे नाव आले असल्याचे सांगितले नाही. त्यांच्या मोबाइलमध्ये या संदर्भात काही आढळून आले आहे का, नेमका कुठे दोष आहे, हे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.अनेक विषय राजकारणाच्या पलीकडचेवाल्मीक कराड यांचे मुंडे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यावरून टीका होत आहे. त्याबाबत बावनकुळे म्हणाले, कोणी कोणाचा मित्र असू शकतो. चांगल्या काळात काम केले तर त्याच्या सोबत राहतो. त्यानंतर बिघडला असेल किंवा गुन्हा केला असेल तर त्याच्या सोबत संबंध असेल तर ही गोष्ट वेगळी. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची सातत्याने भेट घेत आहेत. यावर ते म्हणाले, एखाद्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर राजकारणाशी याचा संबंध नाही. अनेक विषय हे राजकारणाच्या पलीकडचे असतात. आदित्य ठाकरे एखाद्या चांगल्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर यात गैर नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाAjit Pawarअजित पवार