शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

भाजपला देशातील जनतेची नसच सापडली नसल्याने कायदे मागे घेतले; पुण्यातून काँग्रेसची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 3:45 PM

कृषी कायदे रद्द केल्याचा जल्लोष करत आंदोलनात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

पुणे: संसदेत या कायद्यांना सर्वप्रथम काँग्रेसनेच विरोध केला. केंद्रातील भारतीय जनता पक्षच्या सरकारला या देशातील जनतेची नस सापडलेली नाही. हेच त्यांच्या कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून सिद्ध झाले असे मत काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले. काँग्रेस भवनच्या आवारात फटाके फोडून केंद्र सरकारच्या या माघारीचा जल्लोष व आंदोलन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

बागवे म्हणाले, काँग्रेस नेहमीच देशातील सर्व स्तरामधील जनतेला बरोबर घेऊन काम करत असते. जनतेचे काय म्हणणे आहे ते ऐकणे, त्याचा आदर करणे कोणत्याही सरकारचे कामच आहे. त्याऐवजी केंद्र सरकार दडपशाहीने त्यांचे म्हणणे शेतकऱ्यांवर लादत होते.

''सरकारने आंदोलन शेतकऱ्यांचा अंत पाहिला. वर्षभऱ् दुर्लक्ष केले. त्यात अनेक शेतकऱ्यांनी मरणाला कवटाळले, तरीही केंद्र सरकारला जाग आली नाही. आताही पंजाब, उत्तरप्रदेश निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय झाला आहे, पण उशीरा व कोणत्याही कारणाने का होईना त्यांनी शहाणपण दा‌खवले हे महत्वाचे असेे पदाधिकारी म्हणाले.'' 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल कमल व्यवहारे, संजय बालगुडे, रफिक शेख, लता राजगुरू, नीता रजपूत, दत्ता बहिरट, मुख्तार शेख, राजेंद्र शिरसाट, बाळासाहेब अमराळे व पक्षाचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आंदोलनात मरण पावलेल्या सर्व शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार