शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

बालगंधर्वांची हृदयातून गायकी - निर्मला गोगटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 2:31 AM

बंदिश हे रागांवरील भाष्य आहे, तर बालगंधर्वांचे नाट्यगीत हे नाट्य या संकल्पनेवरचे भाष्य होते. शास्त्रीय संगीतात नाभीपासून आणि मोकळा श्वास घेऊन गाणे अपेक्षित असते, बालगंधर्वांनी त्याही पुढची पातळी गाठून हृदयातून आपली गायकी सादर केली.

पुणे : बंदिश हे रागांवरील भाष्य आहे, तर बालगंधर्वांचे नाट्यगीत हे नाट्य या संकल्पनेवरचे भाष्य होते. शास्त्रीय संगीतात नाभीपासून आणि मोकळा श्वास घेऊन गाणे अपेक्षित असते, बालगंधर्वांनी त्याही पुढची पातळी गाठून हृदयातून आपली गायकी सादर केली. आपल्या भूमिकेशी समरस होऊन सहजसुंदर अभिनय करणे हे बालगंधर्वांचे वैशिष्टय होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे यांनी बालगंधर्वांची गायकी उलगडली.बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे सांगली येथील प्रसिद्ध गायिका मंगला जोशी यांना यंदाच्या बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर, कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बालगंधर्वांच्या ५१व्या स्मृतिदिन समारंभानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रुपये २५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे बालगंधर्व गुणगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी मुंबईचे संगीत नाट्यलेखक प्रदीप ओक यांना अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार (रोख रुपये १५ हजार आणि स्मृतिचिन्ह), मुंबईचे प्रसिद्ध गायक पंडित अरविंद पिळगावकर यांना भास्करबुवा बखले पुरस्कार (रोख रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) आणि रत्नागिरीचे तबलावादक हेरंब जोगळेकर यांना डॉ. सावळो केणी पुरस्कार (रोख रुपये १० हजार व स्मृतिचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले.निर्मला गोगटे म्हणाल्या, की आपल्या कलेवर नितांत प्रेम आणि श्रद्धा ठेवून बालगंधर्वांनी हृदयापासून कलेची उपासना केली. विविध कला या सौंदर्यदृष्टी निर्माण करणाऱ्या असतात, तर बालंगधर्वांची गायकी सौंदर्यवृत्ती निर्माण करणारी होती.उल्हास पवार म्हणाले, की बालगंधर्वांचे नाव उच्चारताच महाराष्ट्रीतील नाट्यसंगीत क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण व्हायचे. श्रोत्यांना नेहमीच देव संबोधणारे बालगंधर्व हेच खरे तर अवघ्या महाराष्ट्राचे दैवत होते.बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष सुरेश साखवळकर यांनी प्रास्ताविक केले. नारायण भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे कार्याध्यक्ष स. गो. तथा नाना कुलकर्णी यांनी आभार मानले.या पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नाट्यसंगीताची मैफल रंगली. अरविंद पिळगावकर, बकुल पंडित, सुरेश साखवळकर, मंगला जोशी, रवींद्र कुलकर्णी, सुचेता अवचट, संपदा माने या गायक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यांना धनवर्षा प्रभुणे (आॅर्गन), हेरंब जोगळेकर (तबला) आणि प्रमोद जांभेकर (व्हायोलिन) या वादक कलाकारांनी सुरेल साथसंगत केली.या वेळी गोविंद बल्लाळ देवल पुरस्काराने सांगलीचे शशांक लिमये यांना, काकासाहेब खाडिलकर पुरस्काराने पुण्याच्या प्रसिद्ध गायिका सुचेता अवचट यांना, तर खाऊवाले पाटणकर पुरस्काराने आकुर्डीच्या महिला आॅर्गनवादक धनवर्षा प्रभुणे यांना आणि रंगसेवा पुरस्काराने डोंबिवलीचे सुभाष बिरजे व पुण्याचे प्रमोद भालेराव यांना गौरविण्यात आले. प्रत्येकी रोख रुपये ५ हजार आणि स्मृतिचिन्ह, असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.मुंबईच्या उदयोन्मुख गायिका, अभिनेत्री संपदा माने-कदम यांना ताई पंडित पुरस्काराने, अशोक आंबेकर आणि कल्पना कुलकर्णी यांना द. कृ. लेले पुरस्काराने, बालकलाकार नित्या आनंद बायस यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले.या वर्षीच्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाºया मुंबई महापालिका शिक्षण विभाग-संगीत कला अकादमीचा ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाबद्दल गौरव करण्यात आला.

टॅग्स :Puneपुणे