शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेगव्हाणकरांची परवड थांबणार

By admin | Updated: March 11, 2017 03:16 IST

आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या

ओतूर : आंबेगव्हाण (ता. जुन्नर) येथील मांडवी नदीवरील पूल नसल्यामुळे शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी व शेतकरी यांना शेतमाल काढण्यासाठी व रोजगारासाठी येणाऱ्या मजुरांना नदीवरून आंबेगव्हाण गावाकडे येताना व जाताना लाकडी पाळण्याचा धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. येथील साकव पुलाचे काम पूर्ण झाले असून तो लवकरच खुला होणार आहे.आंबेगव्हाण येथील मांडवी नदीवर पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना दोरीवर बांधलेल्या पाळण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत होता. या पाळण्यातून पडून दुर्घटनाही घडल्या होत्या. विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांच्या या होरपळीबद्दल ‘लोकमत’ने दि. ३१ जुलै २०१६ रोजी ‘स्वातंत्र्यानंतरही शिक्षण अधांतरी’ या शीर्षकाखाली वृत्त दिले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व आंबेगव्हाण या गावाजवळून वाहणाऱ्या मांडवी नदीवरून लाकडी पाळण्यातून शेतकरी व विद्यार्थी कसे येतात, हे पाहण्यासाठी जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर, त्यांच्याबरोबर आमदार सोनवणे, अतुल बेनके, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी भेट दिली.त्यानंतर प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व त्यांनी शासकीय पातळीवर साकव पुलाची नितांत गरज असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाने या साकव पुलासाठी ९८ लाख रुपयांचा निधी तत्काळ मंजूर करून आॅगस्ट २०१६ मध्ये या साकव पुलाच्या कामास प्रारंभ झाला. प्रारंभी नदीपात्रात ७० फूट खोलीचे खड्डे घेऊन त्यात आरसीसी पिलर टाकून त्यांच्यावर स्लॅब ओतण्यात आला. या पुलाविषयी माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते नीलेश महाले व चिंतामण घोलप म्हणाले, की या पुलाची लांबी ७४ मी, असून, रुंदी २ मी. आहे. पुलाला संरक्षक कठडे बसविले आहेत. सध्या ग्रामस्थांनी पुलाचा वापर सुरू केला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी लवकरच ग्रामस्थ बैठक बोलवणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. (वार्ताहर)गेली कित्येक वर्षे आंबेगव्हाण नदी अलीकडील व पलीकडे असणाऱ्या वस्त्यांची येथे पूल व्हावा व जीवघेणा लाकडी पाळणा थांबवावा, अशी मागणी होती. पण, आता पूल झाल्यामुळे ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची सोय झाली. त्याबद्दल शासन व आमची व्यथा मांडणाऱ्या दैनिकास धन्यवाद!- नीलेश म्हात्रे,सामाजिक कार्यकर्तेआंबेगाव येथे श्री गजानन महाराज प्रसारक मंडळाची ही माध्यमिक शाळा आहे. शाळा भरण्याच्या वेळेत व सुटण्याच्या वेळेत २ शिक्षकांना जेथे पाळणा आहे त्या ठिकाणी थांबावे लागे. आता पूल झाल्यामुळे शालेय विद्यार्थी सहज आणि सुखरूप येतात आणि जातात. - माणिक बोऱ्हाडे, मुख्याध्यापक,शारदाबाई पवार विद्यालयया पुलामुळे भोरदरा, गायकरवस्ती तसेच परिसरातील गावांतून शेतमालाची ने-आण करणे शक्य होणार आहे. यामुळे या परिसरात व्यवसाय वृद्धिंगत होणार आहे. पावसाळ्यात दोरीच्या तरफावरून नदी ओलांडणे आता बंद होणार असल्याने आमच्या मनातील भीती दूर होणार आहे. - चिंतामण घोलप, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी