शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खरिपानंतर आता रब्बी हंगामाचीही चिंता

By admin | Updated: September 27, 2015 01:26 IST

खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही.

पुणे : खरिपाच्या हंगामातील उत्पन्नात तीस ते पन्नास टक्के घट येण्याची भीती असताना रब्बीचा पाऊसही पुणे जिल्ह्यात सलग नाही. त्यामुळे शेतकरी पेरण्यांबाबत द्विधा मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचा हंगाम तरी समाधानकारक असेल किंवा कसे याबाबतच्या चिंतेने बळीराजाला घेरले आहे. हंगाम सरत आला तरीही जोरदार पावसाची शेतकऱ्यांची आशा अजूनही संपलेली नाही. जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात खरिपात झालेली बाजरी आणि मुगाची शंभर टक्के पेरणी वाया गेली आहे. भात, भुईमूग, बाजरी, मूग, ज्वारी या प्रमुख खरीप पिकांच्या उत्पन्नात निम्म्याहून अधिक घट येण्याची भीती आहे. ज्या ठिकाणी सिंचनाच्या सुविधा आहेत, अशाही ठिकाणी तीस टक्के घट येऊ शकेल, असे जाणकारांचे मत आहे.मौसमी पाऊस जुन्नर, खेड आणि आंबेगाव तालुक्यांत समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. सध्या बाजरी काढण्याची वेळ असून, शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर या तालुक्यांमधील शेतकरी खरिपाची पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. रब्बीची पिके घेणाऱ्या पुरंदरमध्ये पाऊस समाधानकारक झालेला नसल्याने चिंता संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे गावांमध्ये पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकांना आधार मिळाला. फुलोऱ्याच्या स्थितीत असलेल्या भाताच्या पिकाला पाण्याची खूप गरज असते. मात्र भात, भुईमुगाच्या याच फुले येण्याच्या स्थितीत पाऊस पूर्णपणे गायब झाला असून, खाचरांमधील पाणी आटले आहे. तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम पट्ट्यातही त्यामुळे भात उत्पादनात तीस टक्के घट येण्याची शक्यता आहे.जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश धुमाळ यांनी या माहितीला दुजोरा देत सांगितले, की खरिपाच्या हंगामात पावसाने दगा दिल्याने जेथे उगवण किंवा वाढ समाधानकारक नाही, अशा भागातील शेतकरी पिके मोडून, पिके काढून रब्बीची पेरणी करण्याच्या मन:स्थितीत आहेत. त्यामुळे रब्बीचे क्षेत्र यंदा वाढण्याची शक्यता आहे.उभ्या ऊसपिकाला पावसाचा फायदा झालेला नाही. त्यामुळे उसाच्या उत्पादनातही घट येऊ शकेल. एकूणच खरीप भाताच्या वाढीसाठी, रब्बीच्या पेरण्यांची टक्केवारी वाढण्यासाठी काही तालुक्यांमध्ये जोमाच्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव, पश्चिम हवेलीसह राष्ट्रीय महामार्गालगतच्या तालुक्यांमध्ये झालेली भाताची पेरणी व पिके तग धरून आहेत. वेळेवर पाऊस झाला असता तर भाताची पिके दाणे भरण्याच्या अवस्थेपर्यंत वाढली असती. पावसाने दीर्घ दडी मारल्यानंतर भाताला फुटवे उशिरा आले. पेरणीनंतर दीड महिन्यात भाताचे पीक हाती येते. या वर्षी पावसाने काही तालुक्यांत दडी मारली तर काही तालुक्यांत तो उशिराने सुरू झाला.