शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

टनाला ५०० रुपये अनुदान द्यावे

By admin | Updated: January 19, 2015 23:25 IST

सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे.

बावडा : सध्या साखर कारखानदारी प्रचंड आर्थिक संकटात सापडली असल्याने एफआरपीप्रमाणे उसाला दर देणे अशक्य झाले आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारने साखर कारखान्यांना प्रत्येक टनामागे ५०० रुपये अनुदान दिल्यास ते शक्य होईल, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले. शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ११ मेगावॉट क्षमतेचा सहवीज प्रकल्प कारखान्याच्या चालू गळीत हंगामात कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पातून उत्पादित झालेल्या १ कोटी ११ लाख ११ हजार १११ व्या वीज युनिट एक्स्पोर्टचे पूजन एनसीडीसी दिल्लीचे मुख्य संचालक ए. सर्वदेवा यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, की साखर कारखानदारी टिकवायची आहे, पुढे न्यायची आहे. त्यामुळे ती उत्तम चालली पाहिजे. यावर शेतकऱ्यांचे संसार अवलंबून असून, उसाला योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य व केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेणे गरजेचे आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे. दुर्दैवाने या सरकारच्या काळात आता तसे होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.सर्वदेवा म्हणाले, की या साखर कारखान्याने अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. हा वीज प्रकल्पही अतिशय थोड्या कालावधीत व बचत करून उत्कृष्टरीत्या राबविला आहे. त्यामुळे या कारखान्यांच्या आणखीन नवीन प्रकल्पांना एनसीडीसी सदैव मदत करेल. कार्यकारी संचालक बी. बी. नवले यांनी स्वागत, तर उपाध्यक्ष विलास वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले. बारामती वीज वितरणचे कार्यकारी अभियंता अशोक इरवाडकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दाणी यांची भाषणे झाली. या वेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तानाजी नाईक यांनी आभार मानले. (वार्ताहर)४साखरेचे जर दर वाढणार नसतील, तर साखरेबरोबरच इतर उत्पादनांचा विचार कारखान्यांना करावा लागणार आहे. तरच ही कारखानदारी टिकू शकेल.४ आम्ही ब्राझील देशासह इतर साखर उद्योगातील तज्ज्ञांकडून ‘बी हेवी’ मोलासेस उत्पादनाची माहिती घेत आहोत. ४हे प्रकल्प इतर देशांत यशस्वी झाले असून, त्याबाबत अभ्यास करून भविष्यात हा प्रकल्प उभारण्याचे सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केले.४आघाडी सरकारच्या काळात राज्यात व केंद्रात झपाट्याने निर्णय घेतले जायचे.