शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

थेंबाथेंबांतून साठवले दीड लाख लिटर पाणी

By admin | Updated: July 15, 2014 03:52 IST

पावसाचे जमिनीवर पडलेले भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो.

पुणे : पावसाचे जमिनीवर पडलेले भूगर्भात १५० फूट खाली पोहोचण्यासाठी सुमारे २५ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, हेच पावसाचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे योग्य नियोजन करून आपल्या बोअरवेल्सच्या माध्यमातून भूगर्भात सोडल्यास अवघ्या २५ सेकदांत ते १५० फूट खोल जाते. ही बाब लक्षात घेऊनही आपण नगरसेवक म्हणून केवळ इतरांना पाणीबचतीचे संदेश न देता, ही पाणीबचत आपल्या कृतीत उतरवून लाखो लिटर पाण्याची बचत करण्याबरोबरच इतरांनाही या पाणीबचतीसाठी सहकार्य करण्याचा आदर्श नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे यांनी घालून दिला आहे. घर आणि व्यवसायाच्या ठिकाणी यशस्वीरीत्या रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प राबवून, दर वर्षी तब्बल दीड लाख लिटर पाणी भूर्गभात पोहोचवत आहेत. या प्रकल्पाची दखल अनेक सोसायट्यांनी घेतली असून, सुमारे १० ते १२ सोसायट्यांनी हे प्रकल्प सुरूही केलेले आहेत. कोथरूड येथील सहजानंद सोसायटीमध्ये सहस्रबुद्धे यांची मसाला गिरणी आहे. या ठिकाणी त्यांच्या इमारतीस सुमारे १ हजार चौरस फुटाची बाल्कनी आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत या बाल्कनीत पडणारे पावसाचे पाणी कोणताही वापर न करता तसेच वाहून जात होते. त्यामुळे हे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीची यंत्रणा त्यांनी इंटरनेटवरून शोधली. अखेर अहमदाबाद येथील एका कंपनीस संपर्क साधून त्यांनी ही यंत्रणा सुरू केली. हे पावसाचे साचणारे सर्व पाणी त्यांनी गिरणीसाठी घेतलेल्या बोअरवेलमध्ये भूगर्भात सोडले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी प्रत्येक उन्हाळ्यात सहा मिनिटेही न चालणारी त्यांची बोअरवेल गेली दोन वर्षे अविरत सुरू आहे. हीच यंत्रणा त्यांनी आपल्या एरंडवण्यातील घरातही राबविली. या ठिकाणी २४०० चौरस फुटांचे टेरेस असून, त्यावर पडणारे पावसाचे पाणीही त्यांनी बोअरवेलमध्येच सोडले आहे. या दोन्ही प्रकल्पांतून दर वर्षी सव्वादोन लाख लिटर पाणी भूगर्भात सोडले जात असल्याचे सहस्रबुद्धे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.(प्रतिनिधी)