शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
4
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
5
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
6
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
7
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
8
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
9
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
10
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
11
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
12
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
13
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
14
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
15
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
16
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
17
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
18
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
19
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
20
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
Daily Top 2Weekly Top 5

Uttarakhand Politics: येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील; माजी विधानसभा अध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:40 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.

ठळक मुद्देपुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य यांचा अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत.राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत - काँग्रेस

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही नेते स्वपक्षाला रामराम करुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत तर काहीजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याच काळात जागेश्वरचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे.

आमदार गोविंद सिंह कुंजवाल म्हणाले की, आगामी १५ दिवसांत भाजपाचे(BJP) ६ आमदार काँग्रेस(Congress) पक्षात प्रवेश करतील. संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. विद्यमान आमदार भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. परंतु गोविंद सिंह कुंजवाल यांनी कुठल्याही भाजपा आमदाराचं नाव उघड केले नाही.

राज्यातील जनतेला काँग्रेसकडून अपेक्षा

जागेश्वर आमदार कुंजवाल यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. डबल इंजिनचं सरकार असूनही राज्याचा विकास झाला नाही. आजही राज्यातील जनतेला मुलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. जी विकास कामं काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाली तीदेखील पुढे घेऊन जाता आलं नाही. राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. बेरोजगारी आणि महागाई यामुळे जनता त्रस्त असून पुढील निवडणुकीत भाजपाला चांगलाच धडा मिळेल. कोरोना काळात गरीब एकवेळच्या अन्नासाठी व्याकुळ होते. जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत. त्यामुळेच भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.  

अलीकडेच यशपाल आर्य यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

पुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य(Yashpal Arya) यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात काही महिन्यांवर निवडणुका आल्या असताना यशपाल आर्य यांनी भाजपाला धक्का दिला. यशपाल आर्य यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या एका कॅबिनेट पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपा सरकारवर नियुक्तीचं संकट आहे. त्यामुळे भाजपामध्ये आणखी काही आमदार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस