शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

...तर कमलनाथ चमत्कार करु शकतात; शरद पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 03:24 IST

शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला कोसळणार असा दावा भाजपचे नेते करीत असले तरी राजकीय भूकंपाचा दावा करणाऱ्यांचा शिमगा आता संपलेला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी महाविकास आघाडीला धोका असल्याची शक्यता फेटाळून लावली.

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. मुस्लिम समाजाला शिक्षणात आरक्षण दिले पाहिजे, ही राष्ट्रवादीची भूमिका असून कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला योग्य प्रकारे अर्थसहाय्य दिले जात नाही. महाराष्ट्र ज्या प्रमाणात केंद्राकडे कराची रक्कम जमा करतो त्या प्रमाणात केंद्राकडून अर्थसहाय्य मिळत नाही. निधी देण्याची जबाबदारी केंद्राला टाळता येणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

कमलनाथ चमत्कार करू शकतातमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कर्तृत्वाबद्दल मला विश्वास आहे, त्यांची क्षमता मी जाणतो.ते चमत्कार करू शकतात असे लोकांनाही वाटते, असे सांगत शरद पवार यांनी मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ बाजू पलटतील असे सूचित केले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शिंदे यांना काँग्रेस पक्षाने संधी द्यायला हवी होती. तथापि,लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच काही पद देण्याची पद्धत त्या पक्षात नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाला दोष देता येणार नाही. काँग्रेसकडे नेतृत्व आणि कर्तृत्वही आहे आणि त्या पक्षाचे भविष्य ऊज्ज्वल आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपा