शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 16:02 IST

Sharad Pawar On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटक केले. याच कार्यक्रमात मोदींनी केलेल्या एका विधानावर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. 

Sharad Pawar PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम दौऱ्यावर असताना काँग्रेसला लक्ष्य केले होते. बंजारा समाजाच्या कार्यक्रमात बोलताना मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानावर बोलताना शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, पंतप्रधान पदाची आम्हाला बदनामी करायची नाही, पण त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, असे पवार म्हणाले. 

मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला शरद पवारांसह उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, आदित्य ठाकरे उपस्थित होते. 

मोदींच्या विधानावर बोट, शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार म्हणाले, "पंतप्रधान आले आणि बंजारा संबंधीची मते त्यांनी मांडली, पोहरादेवीला. त्यांनी एक विधान असं केलं की, बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने कुठेही त्यांना संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. ३ वर्ष सुधाकरराव नाईक होते. मनोहरराव नाईक हे मंत्रिमंडळात अनेक वर्ष होते", असे सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिले.  

मोदींनी पदाची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे -शरद पवार

"सगळ्या राज्याचं नेतृत्व करण्याच्या सबंधीची संधी काँग्रेसने बंजारा समाजाला दिली. त्यावर तो समाज कृतज्ञता व्यक्त करतो. आणि देशाचे पंतप्रधान, ते स्वतः येऊन सांगतात की, असं काही घडलेलं नाही. पंतप्रधान ही संस्था आहे, त्याची आम्ही बदनामी करू इच्छित नाही. पण, त्या पदावरील व्यक्तीने त्याची प्रतिष्ठा ठेवली पाहिजे, ती ठेवण्याची भूमिका सुद्धा घेतली जात नाही", अशा शब्दात शरद पवारांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या विधानाला उत्तर दिले.  

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

वाशिममध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'स्वातंत्र्यांनंतर काँग्रेसच्या सरकारांनी, काँग्रेसच्या धोरणांनी बंजारा समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवलं. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष ज्यांनी ताब्यात घेतला त्यांचा विचार सुरुवातीपासून परदेशी राहिला. त्या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमी अपमानजनक वागणूक ठेवली." 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपाcongressकाँग्रेस