शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच सरकार पाडा; उद्धव ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2020 8:52 AM

Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut: गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

ठळक मुद्देमध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याची चर्चामध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर राजस्थानातही गहलोत सरकारवर संकट विरोधी पक्षांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून दिल्लीत हालचाली सुरु असल्याचा आरोप

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. सामनासाठी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे, या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकार आणि भाजपावर घणाघात केल्याचं या टिझरमधून पाहायला मिळतं.

या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. वयाच्या साठीला मला मुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी यासाठीच केला होता हट्टाहास असं नाही, हा योगायोग आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून आमचं सरकार जास्त काळ टिकणार नाही, हे सरकार लवकरच पडेल असा दावा केला जातो यावर उद्धव ठाकरेंनी भाजपा नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.(Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

मी बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरु असतानाचा सरकार पाडा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेत्यांचा समाचार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा राज्यातील ठाकरे सरकार पाडणार आहे अशी चर्चा सुरु आहे, त्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु आहेत, ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान भाजपा राज्यातील सरकार पाडण्याचे डावपेच आखत आहे असा आरोप सत्ताधारी नेत्यांचा आहे.

देशाच्या राजकारणात मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार पाडल्यानंतर त्याठिकाणी भाजपाचे सरकार स्थापन करण्यात आले, ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपात सामील करुन त्यांच्या समर्थकांना मंत्रिपदे देण्यात आली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार अल्पमतात गेले. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर भाजपा नेते शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर अलीकडेच राजस्थानमध्ये सुरु असलेल्या हालचाली वेगाने वाढल्या आहेत. (Uddhav Thackeray Interview with Sanjay Raut)

राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्यानंतर तेथील अशोक गहलोत सरकारवर संकट निर्माण झालं आहे, राजस्थानात काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश, राजस्थान यानंतर भाजपाचा मोर्चा महाराष्ट्राकडे वळणार असल्याचंही काही नेत्यांकडून दावा केला जातो, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेवरुन विरोधकांना खुलं चॅलेंज दिलं आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊतcongressकाँग्रेस