शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2019: सांगलीत युती, आघाडीत होणार अस्तित्वाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 6:39 AM

बालेकिल्ला काँग्रेसचा की भाजपचा, ठरविणारी लढत

- अविनाश कोळीसांगली : प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात गत निवडणुकीत भाजपने बाजी मारत हा किल्ला ताब्यात घेतला होता. या पराभवास मोदी लाटेचे कारण पुढे करीत काँग्रेसने यंदा पुन्हा हा गड ताब्यात घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला नेमका कोणाचा, ही ठरविणारी ही निवडणूक असून युती व आघाडीच्या अस्तित्वाची ही लढाई ठरणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात २०१४ पर्यंत झालेल्या कोणत्याही निवडणुकीत काँग्रेस पराभूत झालेली नाही. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा विक्रमी मतांनी पराभव करीत भाजपचे संजय पाटील निवडून आले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळल्याने भाजपच्या नेत्यांचे बळ वाढले. गेल्या पाच वर्षात भाजपने येथील दबदबा कायम ठेवला, मात्र काँग्रेसनेही विरोधी पक्ष म्हणून अस्तित्वाची लढाई सुरू ठेवली. २०१४ मधील भाजपला मिळालेले यश हे मोदी लाटेमुळे मिळाल्याचा प्रचार काँग्रेसने सुरू ठेवला.त्यामुळे काँग्रेसने हा बालेकिल्ला पुन्हा बळकावण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यातील दिग्गज काँग्रेस नेत्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघासाठी ताकद लावली आहे. त्यांना आता राष्टÑवादीचेही बळ मिळाले आहे.गत निवडणुकीत भाजपला राष्टÑवादीनेही छुपी साथ दिल्याची चर्चा होती. यंदा राष्टÑवादीची राज्यभराची धुरा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या खांद्यावर आली आहे. सांगली-मिरज महापालिकेत त्यांच्या पदरी अपयश आल्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांच्याही बळाची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे राष्टÑवादी या निवडणुकीत प्रामाणिकपणे आघाडीचा धर्म पाळण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. काँग्रेसने ताकद एकवटली असली तरी, सक्षम उमेदवाराची चिंता त्यांना अजूनही सतावत आहे. प्रतीक पाटील यांच्या जिल्ह्यातील संपर्कावरून पक्षांतर्गत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेसुद्धा इच्छुक म्हणून पुढे आले आहेत. तरीही या दोघांव्यतिरिक्ति आमदार विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्या पर्यायाची चाचपणीही पक्षाने केली आहे. तरीही त्यांना अद्याप उमेदवारीचा घोळ मिटविता आलेला नाही.भाजपकडे अनेक सक्षम पर्याय असले तरी, विद्यमान खासदार संजय पाटील यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. भाजपने या मतदारसंघासाठी पूर्वतयारी केली आहे. या मतदारसंघाअंतर्गत विधानसभेचे जे सहा मतदारसंघ समाविष्ट आहेत, त्यातील तीन जागा भाजपकडे, एक शिवसेनेकडे व अन्य काँग्रेस, राष्टÑवादीकडे आहेत. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात युतीचे पारडे जड आहे.भाजपला गटबाजीचे ग्रहणगेल्या पाच वर्षात अनेक घडामोडींमुळे युतीच्या ताकदीबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते अजितराव घोरपडे हे सध्या नाराज आहेत. मिरज मतदारसंघात भाजपअंतर्गत गटबाजी उफाळली आहे. जत व खानापूर-आटपाडी मतदारसंघातही भाजपमध्ये उघडपणे गटबाजी दिसून येत आहे. त्यामुळे भाजपला २0१४ च्या तुलनेत यंदा अधिक संघर्ष करावा लागणार आहे. भाजपअंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न कॉंग्रेस व राष्टÑवादीकडून सुरू आहे. त्याला यश मिळाले तर भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते.गत निवडणुकीतील परिस्थितीउमेदवार पक्ष मते टक्केसंजय पाटील भाजप   ६,११,५६३   ५८.४३प्रतीक पाटील कॉंग्रेस  ३,७२,२६१  ३५.५७

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस