शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 19:34 IST

राज्याच्या राजकीय इतिहासातले नवे वळणाची नांदी असेल कदाचित.. पण या नांदीने एकीकडे काँग्रेसला धक्का तर भाजपाला आनंदाची ‘घडी’ दिली....

- राजू इनामदार -

गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला तोच मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तू ताण मी ओढतो ह्या भूमिकेमुळे.. आघाडी होऊनही न झालेली कुणा एकाची ‘माघार’ शेवटी ‘बंडखोरी’वर येवून ठेपली.. आणि... पाहायला मिळाला.. आजोबांच्या ‘बेरकी’ राजकारणाचा वारसाचा ' रिमेक ' ....

डॉ. सुजय राधाकृष्ण विखे पाटील हे विखे घराण्याच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधी. शिक्षणाने डॉक्टर आहेत. त्यातही मेंदूविकार तज्ज्ञ. इंदोर, बेळगाव, पुणे व नंतर अर्थातच घरच्या प्रवरा मेडिकलमधून त्यांनी पदवी घेतली. वयात आले त्यावेळी त्यांच्यासाठी संस्थानाचे सगळे दरवाजे खुले होते. मात्र त्यांना खुणवत होते ते राजकारणच! त्यामुळे डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्याची वेळ त्यांच्यावर कधी आलीच नाही. तसा पेहरावही त्यांनी कधी केला नाही. वाढलेली दाढी, पांढरा झब्बा पायजमा व अगदीच कधी घातले तर त्यावर जाकीट असा साधाच पण राजकारणाशी नाते सांगणारा पोषाख ते कायम परिधान करतात. त्याबाबतीत त्यांनी आजोबा बाळासाहेब विखे यांच्या पावलावर पाऊल टाकले आहे. त्यांची राजकीय समजही विलक्षण आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या एका सभेत त्यांनी चांगले भाषण केले, मात्र चुकुनही त्यांनी मुख्यमंत्री किंवा भाजपा यांच्यावर टीका केली नाही. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने खासगीत बोलताना त्यांना याबाबत विचारले तर ते म्हणाले, ‘त्यांच्याकडे जावे लागले तर या टिकेचा त्रास होईल, मग कशासाठी करायची टीका?’ भाजपात त्यांचा प्रवेश झाल्यावर आता राष्ट्रवादीत हा किस्सा प्रसिद्ध झाला आहे. सूजय किंवा एकूणच विखे यांच्या अशा राजकारणामुळेच की काय पण पवार यांनी नगर दक्षिण मतदार संघ काँग्रेसला देण्याचे नाकारण्याबरोबरच सूजय यांना राष्ट्रवादीत घेणेही टाळले असावे. सूजय शैक्षणिक संस्थांमध्ये लक्ष घालत असतानाच कौटुंबिक आधारवड असलेल्या बाळासाहेब विखे यांचे निधन झाले. त्यापुर्वी बाळासाहेबांच्या माध्यमातून या घराण्यात सलग ४० वर्षे खासदारकी होती. बाळासाहेब असतानाच ती गेली होती. त्यांना ती फार खंत होती. सूजय च्या रूपाने पुन्हा खासदारकी घरात यासाठी असे त्यांना वाटत असल्याचे आता सांगण्यात येते. खरेखोटे त्यांनाच माहिती, पण सूजय यांनी राजकारणातील आपला रस कधीही लपवून ठेवला नाही. लहानमोठ्या पदांपेक्षा थेट खासदारकीलाच हात घालण्याचे त्यांनी कधीचेच ठरवून टाकले होते. याही बाबतीत त्यांनी आजोबांचाच वारसा चालवला आहे. नगर दक्षिण हा मतदारसंघ त्यांना सोयीचा वाटला. तिथे त्यांनी मागील दोन वर्षांपासून लक्ष घालण्यास सुरूवात केली. काँग्रेसकडून उमेदवारी मिळणारच असा त्यांचा ग्रह असेल, पण राजकारण म्हणजे काय याचा त्यांना पहिला धडा उमेदवारीसाठी धडपड करावी लागली तेव्हाच मिळाला. राष्ट्रवादीने मतदारसंघ बदलासाठी नकार दिला. पण सूजय मागे हटले नाहीत. हवे तर भाजपात प्रवेश करेल, तेही नाही झाले तर अपक्ष निवडणूक लढवेल असे जाहीरपणे म्हणून त्यांनी धूर्तपणे आपल्या नावाची हवा तापवत ठेवली व त्याचा योग्य उपयोग होईल याची काळजीही घेतली. इथेही त्यांनी राजीव गांधी यांच्या विरोधात दिल्लीमध्ये खासदारांचा ‘विचार मंच’ स्थापन करणाºया आजोबांचाच कित्ता गिरवला आहे. भाजपातील त्यांचा प्रवेश वडिल राधाकृष्ण यांच्या राजकारणासाठी तापदायक ठरेल यांची त्यांना कल्पना नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. फक्त वडिलच नाही तर आई शालिनी याही जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्याच अध्यक्ष आहे. तरीही त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तत्पुर्वीच त्यांनी खास बाळासाहेबांची म्हणून असलेली स्वतंत्र निवडणूक यंत्रणा कार्यरत केली असणार. वेगवेगळ्या संस्थांमधील कर्मचाºयांच्या नियुक्त्या झाल्या असतील. नगर दक्षिण च्या प्रत्येक तालुक्यातील नातेवाईकांच्या, पुन्हा त्यांच्या नातेवाईकांच्या याद्या तयार झाल्या असतील. त्यांच्याशी संपर्कही सुरू झाला असेल. काहीही करून ही निवडणूक जिंकायचीच असा पणच त्यांनी केलेला दिसतो आहे. नातवाचे पाऊल आजोबांच्या पावलावर पडते आहे असेच यासंदर्भात जुनेजाणते म्हणत आहेत. राजकारणातील ही पहिलीच लढाई सूजय जिंकतात की हरतात यापेक्षा ते ही लढाई लढतात कशी हेही महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक