शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकेनंतर पहिला फोटो समोर; ४ नातेवाईकांसोबत फ्लॅटवर राहत होती...
2
Maharashtra SSC Result 2026: आज दहावीचा निकाल कसा अन् कुठे पाहणार?; 'अशी' सोपी ट्रिक फॉलो करा
3
चार कागदपत्रे नसतील तर महाराष्ट्रात राहता येणार नाही; व्हायरल पोस्टनंतर सरकारने सांगितलं सत्य 
4
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
5
MS Dhoni: बिहार- झारखंडमध्ये २० हजार कोटी रुपयांची करवसुली; धोनी ठरला सर्वाधिक कर भरणारा व्यक्ती
6
ज्या सरकारी बँकेत ₹६५ साठी केलेलं साफसफाईचं काम आज त्याच बँकेत बनल्या AGM; कोण आहेत प्रतीक्षा तोंडवलकर?
7
'धुरंधर २' च्या OTT रिलीजची तारीख कन्फर्म? कोर्टातील सुनावणीवेळी निर्मात्यांनी केला खुलासा
8
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
9
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
10
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
11
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
12
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
13
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
14
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
15
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
16
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
17
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
18
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
19
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
20
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
Daily Top 2Weekly Top 5

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 16:03 IST

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही.आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे.सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत.

गाजियाबाद - हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे मंगळवारी केंद्रीय कृषी विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी यूपी गेट इथं पोहचले. त्यावेळी चौटाला यांनी भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीत एकत्र राहण्याचं आश्वासन दिलं. त्याचसोबत संपूर्ण देशभरात इंडियन नॅशनल लोकदल केंद्र सरकारविरोधात आंदोलन करेल असंही ओम प्रकाश चौटाला यांनी इशारा दिला.

यावेळी बोलताना ओम प्रकाश चौटाला म्हणाले की, आंदोलनाचा परिणाम काहीही असो पण केंद्र सरकार लवकरच कोसळणार आहे. आज पूर्ण देश कृषी विधेयकाच्या विरोधात उभा आहे. शेतकरी चिंतेत आहे. बाजारात धान्य खरेदी करण्यासाठी कुणी येत नाही. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेले घटक पक्ष वेगळे होत आहेत. केंद्र सरकार अल्पमतात येईल. सरकार कोसळून मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असा दावा त्यांनी केला.

तर शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा. ओमप्रकाश चौटाला यांच्या पाठिंब्यानं नवी उर्जा मिळाली आहे. यूपी गेटवर किसान शहीद स्मृती दिवस साजरा केला जाईल. २१ जुलै १९८० मध्ये कर्नाटकात फायरींग झाली होती त्यात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या स्मृती जागवण्यात येतील असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला?

ओम प्रकाश चौटाला हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. २ जुलै रोजी तिहाड जेलमधून त्यांची सुटका झाली. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी चौटाला यांना १० वर्षाची शिक्षा झाली होती.

...तर देशात युद्ध होईल

शेतकरी तर परत जाणार नाही, शेतकरी तेथेच राहतील. सरकारने चर्चा करायला हवी. ५ सप्टेंबरला मोठी पंचायत बोलावली आहे. पुढचा जो काही निर्णय असेल, त्यात घेऊ. सरकारकडेही दोन महिन्यांचा कालावधी आहे. सरकारही निर्णय घेऊ शकते, शेतकरीही करतील. सरकारने नाही ऐकलं तर देशात युद्ध होईल असं वाटतंय" असे राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकार