शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: November 29, 2020 12:06 IST

कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक; हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशावर

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या लाठीमारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक दिली जातेय. हे दुर्दैवी आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. कृषी कायद्यांविरोधात गेल्या चार दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातले शेतकरी आंदोलन करत आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांना चर्चेचं आवाहन केलं आहे. 

'कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या अन्नदाता शेतकऱ्याला दिली जाणारी वर्तणूक निषेधार्ह आहे. हे शेतकरी देशातले नाहीत, ते बाहेरून आले असावेत, अशी वागणूक त्यांना दिली जात आहे. रस्त्यावर उतरलेले बहुतांश शेतकरी पंजाब आणि हरयाणातून आलेले आहेत. त्यांना विभाजनवादी, खलिस्तानी म्हणणं हा त्या शेतकऱ्यांचा अपमान आहे. जर आपण पंजाबमधून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला खलिस्तानवादी म्हणत असाल तर याचा अर्थ आपण पंजाबमध्ये पुन्हा तोच काळ आणू इच्छिता. लोकांना आठवण करून देऊ इच्छिता की तुम्ही पुन्हा त्याच मार्गानं जावं. देशाच्या स्थिरतेसाठी हे चांगलं नाही,' अशी टीका राऊत यांनी केली. 




गेल्या चार दिवसांपासून हजारो शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना नवी दिल्लीच्या सीमेवर रोखण्यात आलं आहे. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर होत आहे. मात्र शेतकऱ्यांचा आंदोलनाचा पवित्रा कायम आहे. शेतकऱ्यांनी रस्त्याऐवजी मैदानात आंदोलन करावं. त्यानंतर सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन गृहमंत्री अमित शहांनी केलं आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊत