शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

UP Election 2022: “BJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:25 PM

UP Election 2022: वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देभाजपवाल्यांची चांगलीच धुलाई कराBJP वाले मतं मागायला आले तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नकाओमप्रकाश राजभर यांच्या धक्कादायक विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

वाराणसी: येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आतापासूनच सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यात सर्वांत आघाडीवर भाजप असल्याचे दिसत असून, भाजपला पराभूत करण्यासाठी काही पक्षांनी एकत्र आले आहेत. यामध्ये सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या नेते ओमप्रकाश राजभर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. वाराणसी दौऱ्यावर असलेल्या ओमप्रकाश राजभर यांनी धक्कादायक विधान केले असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मते मागायला आले, तर त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका, असे विधान केले आहे. (up election 2022 om prakash rajbhar advises women to beat up bjp leaders in varanasi)

ओमप्रकाश राजभर वाराणसी येथील भोजूबीर भागात एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांनी महिलांना संबोधित करताना वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी जर मते मागायला आली, तरी त्यांना दोन पायांवर परत पाठवू नका. ते येतील दोन पायांवर, पण जातील चौघांच्या खांद्यावर, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

“ओवेसी यांना एक सभ्य माणूस समजत होते, पण...”; उमा भारतींचे टीकास्त्र

भाजपवाल्यांची चांगलीच धुलाई करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाने आग्रहाने जनधन खाती उघडायला लावली. यामागील मुख्य उद्देश त्या खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करण्याचा होता. मात्र, तसे काहीच झाले नाही. त्यामुळे आता यापुढे भाजपवाले मते मागायला आले, तर त्यांची चांगलीच धुलाई करा. भाजपवाले येतील दोन पायांवर पण चौघांच्या खांद्यावरून परत जातील, असे वादग्रस्त विधान राजभर यांनी केले. तसेच महिलांचे आरक्षण लवकरात लवकर लागू करावे. पुन्हा आलात, तर जीवंत परत जाऊ शकणार नाही. मोफत रेशन देऊन भाजप गरिबांना गुलाम बनवू पाहत आहे. देशातील सर्व भाजप नेत्यांचे मोतिबिंदूचे ऑपरेशन करायची वेळ आलीय, असे राजभर यांनी म्हटले आहे. 

आता पेट्रोल आणि डिझेल एकाच दराने मिळणार? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओम प्रकाश राजभर आणि एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी एकत्रितपणे भागीदारी संकल्प मोर्चा स्थापन केला असून, आम आदमी पक्षाने यामध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एमआयएम पक्षाचे उत्तर प्रदेशमधील अध्यक्ष शौकत अली यांनी भागीदारी संकल्प मोर्चात ८ पक्षांचा समावेश असल्याचे सांगितले होते. या मोर्चाचे संयोजक राजभर उत्तर प्रदेशात मजबूत गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपला या निवडणुकीत पराभूत करणे हेच या मोर्चाचे ध्येय असल्याचे अली यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूकyogi adityanathयोगी आदित्यनाथ