शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाची निर्गुंतवणूक ही एका नव्या घोटाळ्याची सुरुवात...डॉ.सुब्रमण्यम स्वामींचा भाजपा सरकारवरच हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 16:07 IST

डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवर नवा स्फोट घडवला आहे. त्यांच्या स्फोटामुळे सत्तेतील भारतीय जनता पक्षाचे सरकार हादरले आहे. @Swamy39 या हँडलने केलेले डॉ.स्वामींचे ट्विट धक्कादायक आहे. त्यांनी एअर इंडियांच्या निर्गुंतवणूकीला नव्या घोटाळ्याची सुरुवात म्हटले आहे. त्यामुळे स्वच्छ कारभारासाठी पाठ थोपटून घेणाऱ्या भाजपाच्या मोदी सरकारला घरचा आहेर मिळाल्याचे मानले जात आहे.

मोदी सरकारने सार्वजनिक मालकीच्या एअर इंडिया या विमान सेवेचे निर्गुंवणुकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्गुंतवणुकीच्या या प्रस्तावाला विरोधातील राजकीय पक्षांकडून विरोध केला जात आहे. त्याचवेळी आता थेट घोटाळ्याचे आरोप होऊ लागल्याने ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडू लागली आहे. त्यातच आता भाजपाचेच खासदार डॉ.स्वामी यांनी थेट घोटाळ्याचा आरोप करत फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीचा प्रस्ताव नेमका कसा?

सध्या सार्वजनिक क्षेत्रातील असलेल्या एअर इंडियातील ७६ टक्के हिस्सा आणि खाजगी कंपनीला व्यवस्थापन सोपवले जाईल. नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्स्प्रेस आणि संयुक्त कंपनी एअर इंडिया एसएटीएस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्राइव्हेट लिमिटेड या सर्व कंपन्यांमध्ये सरकार २६ टक्के हिस्सा राखणार आहे. एअर इंडियामध्ये भागभांडवल घेणाऱ्या कंपनीला ते पुढील तीन वर्षे विकता येणार नाही. कायम राखावे लागेल. त्यासाठी इंटिमेशन ऑफ इंटरेस्ट मागवण्यात आले आहेत. त्यासाठी १४ मे ही अंतिम मुदत आहे. २८ मार्चला कोण यशस्वी ठरले ते जाहीर केले जाणार आहे. किमान पाच हजार कोटी नेटवर्थ असलेली कंपनी किंवा समूह बोली लावू शकतो.



 

 

वाद कशामुळे?

एअर इंडिया तोट्यात आहे. दरवर्षी तोटा वाढतच असल्याने निर्गुंतवणूक करावी लागत असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र ७६ टक्के हिस्सा खाजगी कंपनीला देताना कंपनीवर असलेल्या कर्जापैकी ५२ टक्क्याची जबाबदारी सरकारनेच घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी ट्विट करुन थेट आरोप केला आहे. अशा प्रकारे कर्जाची जबाबदारी स्वत:कडे ठेऊन भागभांडवल देणे म्हणजे खाजगी कंपनीला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.



 

तृणमुल काँग्रेसच्या नेत्या, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला विरोध केला आहे. एकीकडे विरोधक रान उठवत असतानाच दुसरीकडे आता भाजपाचेच नेते आणि घोटाळ्यांविरोधातील लढवय्ये डॉ.सुब्रमण्यम स्वामी यांच्या ट्विटने खळबळ माजवली आहे. स्वामी म्हणतात, ‘’एअर इंडियाचे निर्गुंवणुकीकरण ही नव्या घोटाळ्याची सुरुवात वाटत आहे.” 

स्वामी तेवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांनी इशारा दिला आहे की, “जर मला या व्यवहारात काही काळे-बेरे आढळले तर मी या प्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करेन.” विरोधकांच्या जोडीला डॉ.स्वामीही आक्रमकतेने तुटून पडल्याने मोदी सरकारसमोर नव्या अडचणी निर्माण होणार असल्याचे मानले जात आहे.

 

टॅग्स :Air India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूकAir India Scamएअर इंडिया घोटाळाDr. Subramanian Swamyडॉ. सुब्रमण्यम स्वामीAhmed Patelअहमद पटेल