शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

युवकांनी फिरवली पाठ

By admin | Updated: January 18, 2016 01:03 IST

शहरात महापालिकेच्या वतीने १९ ग्रंथालयांपैकी चार बंद पडली आहेत. उर्वरित ग्रंथालयांपैकी फक्त एकच ग्रंथालय सुरू आहे. सर्व ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे.

भोसरी : शहरात महापालिकेच्या वतीने १९ ग्रंथालयांपैकी चार बंद पडली आहेत. उर्वरित ग्रंथालयांपैकी फक्त एकच ग्रंथालय सुरू आहे. सर्व ग्रंथालयांची अवस्था बिकट आहे. सोशल मीडियाचा परिणाम हा असून, ज्येष्ठ नागरिक सोडता तरुणांनी वाचनालयाकडे पाठ फिरवली आहे, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.जुन्या काळातील अस्वच्छ फर्निचर, काही वाचनालयांत कोणी फिरकत नाही, तरकाही ठिकाणी फक्त शिपायांच्या देखरेखीखाली काम चालते, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. पुस्तकांची अवस्था अनेक वाचनालयांमध्ये बिकट झाली आहे. भोसरीचे भैरवनाथ वाचनालय हे जवळजवळ ८३ वर्षे जुने आहे. तरीही शंभर वाचक या वाचनालयाला मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. शहरात दीड हजार वाचक महापालिकेच्या सार्वजनिक वाचनालयांना मिळत नाहीत. अनेक वाचनालयांमध्ये पुरस्कारप्राप्त व दर्जेदार पुस्तकेच नाहीत. साहित्य अकादमीसह विविध ख्यातनाम पुरस्कारांनी गौरविलेल्या, तसेच नामवंत साहित्यिकांचे गाजलेले साहित्य कोठेच दिसत नाही. भालचंद्र नेमाडे, नरहर कुरुंदकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडुलकर, अनिल अवचट, दुर्गा भागवत, सदानंद देशमुख, संजय पवार, सदानंद मोरे, मेघना पेठे यांच्यासारख्या लेखकांच्या पुरस्कारप्राप्त ग्रंथासह विपुल ग्रंथपरंपरा आढळून येत नाही. भालचंद्र नेमाडे यांच्या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कोसला उपलब्ध होत नाही. सदानंद मोरे यांच्या तुकाराम दर्शनासह विश्वास पाटील यांच्या पांगिरा, चंद्रमुखी यांसह क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर लिहिलेले पुस्तक नसल्याचे सांगण्यात येते. ग्रंथपाल सहकार्य करीत नाहीत, असा आरोप अनेक वाचक करीत आहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचे वेड वाढले आहे. त्यांच्यामध्ये इंटरनेटची क्रेझ आहे. तरुण वाचक मिळत नाहीत. ज्येष्ठ नागरिकच वाचनालयात येतात. तरुणांची संख्या वाढावी, यासाठी ग्रंथालय अत्याधुनिक करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सहायक आयुक्त आशादेवी दुर्गुडे यांनी सांगितले.(वार्ताहर)