शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
3
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
4
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
5
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
6
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
7
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
8
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
9
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
10
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
11
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
12
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
13
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
14
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
15
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
16
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
17
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
18
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
19
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
20
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 

पोलीस जनतेसाठीच, त्यांचे म्हणणे ऐकून घेत समस्या सोडविण्यावर भर राहणार: कृष्ण प्रकाश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 8:11 PM

नागरिकांशी संवादासाठी टाॅक टू काॅप्स उपक्रम

पिंपरी : जनतेसाठीच पोलीस असून, नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यावर भर राहील. तसेच पोलिसांची जबाबदारी, कर्तव्य व अधिकार याबाबत त्यांना माहिती देणार आहे. त्यासाठी टाॅक टू काॅप्स हा उपक्रम राबवून नागरिकांशी संवाद साधण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे. 

नागरिक पोलिसांकडे अनेक तक्रारी करतात. त्यात काही तक्रारींचे निराकरण करणे पोलिसांच्या अधिकारात येत नाही. तरीही सर्वसामान्यांकडून त्या समस्या मांडल्या जातात. पोलिसांची जबाबदारी आणि अधिकार याबाबत माहिती नसल्याने, असे होते. मात्र असे असले तरी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन झाले पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. 

तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या आहेत, हे समजून घेऊन संबंधित यंत्रणेशी समन्वय साधण्यात येईल. महापालिका, महसूल विभाग, आरटीओ अशा संबंधित विभागाकडे तक्रारी मांडण्याबाबत नागरिकांना सहकार्य केले जाईल. टाॅक टू काॅप्स या उपक्रमातून पोलीस नागरिाकंपर्यंत पोहचणार आहेत. शहरातील पिंपळे साैदागर, सांगवी, चिंचवड, चाकण, देहूरोड, वाकड या सहा ठिकाणी या कार्यक्रमाचे टप्प्याटप्प्याने आयोजन केले जाईल. चिंचवड येथील कल्याण प्रतिष्ठान येथे बुधवारी (दि. ३०) सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे. महासेतू या संस्थेच्या माध्यमातून उपक्रम राबवण्यात येत आहे. 

टाॅक टू काॅप्स या उपक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहे. पोलीस जनतेसाठीच आहेत. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा जाणून घेऊन त्यांच्यासाठी कार्यरत राहण्यासाठी प्रयत्न आहे. - कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी - चिंचवड

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्त