शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

पिंपरी - चिंचवडकरांसाठी खुशखबर! मावळातील पवना धरण १०० टक्के भरलं, ३४५० क्यूसेकन विसर्ग सुरु...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 7:55 PM

नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू

पिंपरी : मावळात पावसाची संततधार सुरू असल्याने पवना धरणातून ३४५०  क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण मागील आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. यंदा पस्तीस दिवसात धरण भरले होते. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाचा जोर सुरू आहे. त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे १३५० क्यूसेक वीज निर्मितीसाठी पाणी सोडले आहे. तसेच पावसाचा जोर कायम असल्याने रविवारी आठनंतर सांडव्याद्वारे २१०० क्यूसेक पाणी असा एकूण संचाद्वारे  ३४५० क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.

पावसाची संततधार सुरू

शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. सुट्टीचा दिवस असल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची पावसामुळे तारांबळ उडाली होती. भाजी मंडईतही चिखल झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

दक्षतेचा इशारा

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्या वाहतात. महापालिकेच्या वतीने नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. पवना नदीतीरावरील चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, दापोडी भागातील नदीकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :mavalमावळDamधरणRainपाऊसWaterपाणी