शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

हवामानाच्या बदलामुळे नागरिक हैराण, रुग्णांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 01:00 IST

मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचे अचानक प्रमाण वाढले. मात्र नंतर थंडी सौम्य झाली.

कामशेत - मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. काही दिवसांपूर्वी थंडीचे अचानक प्रमाण वाढले. मात्र नंतर थंडी सौम्य झाली. मात्र पुन्हा एकदा तीन ते चार दिवस थंडीचा कडाका रात्र अन् दिवस तसाच राहिला. मागील दोन दिवसांपासून ही कडाक्याची थंडी अचानक गायब झाली.रात्रीची थंडी आणि दुपारचे कडक ऊन अशी परिस्थिती असतानाच रविवारी सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. वातावरणात कमालीचा बदल झाला असून, परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.मागील काही वर्षांपासून मावळ तालुक्यातील वातावरणात मोठा बदल होत आहे. अचानक होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याचा प्रामुख्याने लहान मुले, वयोवृद्ध व महिलांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. आता रात्रीची थंडी आणि दिवसा कडक ऊन असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, प्रत्येक घरात एखाद-दोन पेशंट दिसत आहेत. यात प्रामुख्याने अंगदुखी, सांधेदुखी, ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, पोटाचे विकार आदी आजारांच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत झाली आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रासह शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. यात प्रामुख्याने मुले, वयोवृद्ध व महिलांचे प्रमाण मोठे आहे. अनेक ठिकाणी सांडपाणी व कचºयाची समस्या गंभीर असल्याने मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. यात ताप, थंडी, सर्दी, खोकला, अंगदुखी आदी आजारांचे रुग्ण जास्त आढळून येत आहेत. स्वाइन फ्लू, डेंगी, मलेरिया, टायफॉईड आदींच्या भीतीने नागरिक आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांकडे धाव घेताना दिसत आहेत. मंडळी बाधित होत असून, वयोवृद्ध व लहान मुलांच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत आहे.मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. या गृहप्रकल्पावर अनेक मजूर काम करत आहेत. त्यांना निवारा शेडमध्ये रात्र काढावी लागते.अनेक वेळा त्यांना थंडीमध्ये कुडकुडत पडावे लागत आहे. तसेच प्राण्यांना आणि पक्ष्यांवरही बदलत्या हवामानाचा परिणाम होत असल्याचे जाणवत आहे.विकेश मुथा : मुलांच्या आरोग्यावर परिणाममागील तीन ते चार दिवसांपासून थंडी व कडक ऊन यामुळे रोगसदृश वातावरण तयार झाले आहे. विषाणूंच्या वाढीसाठी असे बदलते वातावरण पोषक असते. शरीराच्या तापमानात सतत बदल होत असल्याने प्रतिकारशक्ती कमी होते. त्यातून विषाणूंचा संसर्ग होतो. अशा बदलणाºया वातावरणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या व वयोवृद्धांच्या आरोग्यावर होतो. तसेच सांधेदुखी, संधिवात या आजारांच्या रुग्णांचा त्रास वाढतो.डॉ. विकेश मुथा

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र