शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

वाहतुक कोंडीने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 4:14 AM

शहरातील बाजारपेठ गुरुवारपासून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. यामुळे सकाळी दहा ते दुपारी ...

शहरातील बाजारपेठ गुरुवारपासून सकाळी सात ते दुपारी दोन या कालावधीत सुरू करण्यात आली आहे. यामुळे सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीत नागरिक तसेच नोकरदार व ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांची विविध साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यातच नारायण चाळ हा परिसर मोंढा तसेच स्टेशन रोड व बाजारपेठेला जोडणारा मुख्य चौक आहे. शहरात प्रवेश केलेली अनेक वाहने या मार्गे मोंढ्यात दाखल होतात. यासह शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, जनता मार्केट, नानलपेठ, कडबी मंडी आदी भागातील रस्त्यांवर गेल्या दोन दिवसांपासून सकाळी दहा ते दुपारी दोनच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, ठराविक भागांमध्येच शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामुळे चौकांमध्ये होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहनधारकांनाच प्रयत्न करावे लागत आहेत.

ट्रक, टेम्पोमुळे अडथळा

शेती साहित्याची ने-आण करणाऱ्या तसेच किराणा मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रक, टेम्पोमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. रस्ते अरुंद असल्याने एकावेळी एकच मोठे वाहन ये-जा करू शकते. त्यामुळे छोटी, मोठी वाहने अडकून पडत आहेत.

सिग्नल बंद असल्याने अडचण

शहरातील जिंतूर रोड तसेच वसमत रोड या भागासह बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर सिग्नल व्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, हे सिग्नल बंद आहेत. सिग्नल व्यवस्था सुरू केल्यास वाहनधारक स्वतःहून शिस्त पाळून ये-जा करू शकतील. परंतु, सिग्नल बंद असल्याने वाहने बिनदिक्कतपणे मिळेल त्या जागेतून काढण्याचा प्रयत्न वाहनधारक करीत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.