शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत तोबा गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:14 IST

परभणी : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे मागील ९ दिवसांपासून ठप्प असलेल्या येथील बाजारपेठेत शुक्रवारी प्रथमच आर्थिक व्यवहार झाले. ...

परभणी : जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या संचारबंदीमुळे मागील ९ दिवसांपासून ठप्प असलेल्या येथील बाजारपेठेत शुक्रवारी प्रथमच आर्थिक व्यवहार झाले. किराणा साहित्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केल्याने बाजारपेठ गजबजून गेली होती.

कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. फिजिकल डिस्टन्स आणि मास्कचा वापर बंधनकारक केल्यानंतरही जिल्ह्यातील गर्दी कमी होत नसल्याने संसर्ग वसाहतींमधून ग्रामीण भागात पसरत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २४ मार्चपासून ते १ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. या सात दिवसांच्या काळात जिल्हाभरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती. व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर दुसरीकडे किराणा साहित्य, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंसाठी गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांची धांदल उडाली.

७ दिवसांपासून व्यवहार बंद असल्याने संचारबंदी रद्द करावी, या मागणीने जोर धरला. व्यापारी, विविध पक्ष संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने २ एप्रिलपासून संचारबंदीत सूट देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सकाळी ७ ते दुपारी २ यावेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्यात आली. ९ दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प असल्याने नागरिकांनीही खरेदीसाठी मोठी गर्दी केली. सकाळी १० वाजेपूर्वीच बाजारपेठ भागात गर्दी पाहावयास मिळाली. सकाळचा भाजीपाला खरेदीपासून सुरू झालेली ही गर्दी दुपारी २ वाजेपर्यंत कायम होती. कच्छी बाजार, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ या भागामध्ये ग्राहक मोठ्या संख्येने खरेदीसाठी दाखल झाले. त्यामुळे अनेक दिवसानंतर बाजारपेठ फुल्ल झाल्याचे पाहावयास मिळाले.

वाहतुकीवर ताण

अनेक दिवसानंतर मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले. संचारबंदीमुळे आतापर्यंत ओस असलेल्या रस्त्यांवर वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. एकाच वेळी वाहनांची संख्या वाढल्याने बाजारपेठ भागातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आला. दिवसभरात अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली होती. येथील नवा मोंढा भागात किराणा मालाच्या ठोक विक्रेत्यांची दुकाने आहेत. या भागातही खरेदीसाठी झुंबड उडाल्याने वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले. परभणी शहरासह जिल्हाभरात बाजारपेठेतील व्यवहार काही काळासाठी शिथिल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

पोलिसांची गस्त

दुपारी २ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यास निर्बंध असल्याने पोलीस प्रशासनाने दुपारी २ नंतर मुख्य बाजारपेठेमध्ये गस्त घालून दुकाने बंद करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. तसेच रस्त्यावरील गर्दीही हटविली. शुक्रवारी शहरातील शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर, अष्टभुजा देवी मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसर या भागात पोलिसांचा बंदोबस्त लावला होता.