शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून सात दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले ...

मागील महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यात मागच्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येचा उद्रेक होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज २०० पेक्षाही अधिक रुग्ण नोंद होत असल्याने आता प्रशासनाने कठोर पावले उचलली असून, जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाने हा निर्णय जाहीर केला. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संचारबंदीचा पर्याय निवडण्यात आला आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ३१ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्हाभरात संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काढले आहेत. त्यामुळे बुधवारपासून जिल्ह्यात सर्व बाजारपेठ तसेच इतर आस्थापना बंद ठेवण्यात येणार आहेत. संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

२० दिवसांत २४७० रुग्ण

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहेत. १ मार्चपासून ते २० मार्चपर्यंत २हजार ४७० रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे १५ ते २० मार्च या पाच दिवसांमध्ये १ हजार ७५८ रुग्ण नोंद झाले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा वाढलेला आलेख लक्षात घेता संचारबंदीचा पर्याय निवडण्यात आला आहे.

पराजिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना

जिल्हाबंदी

परभणी : बाहेर जिल्ह्यांतून परभणीत ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून, हा संसर्ग रोखण्यासाठी नोकरीच्या निमित्ताने अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यास कर्मचाऱ्यांना बंदी घातली आहे. तसेच बाहेर जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सोमवारी हे आदेश काढले.

मास्क न वापरल्यास आता क्वाॅरंटाइन

परभणी : मास्कचा वापर न करता सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळून आल्यास संबंधितास ताब्यात घेऊन त्याला एक दिवसासाठी क्वाॅरंटाइन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी प्रशासन उपाय करीत असताना नागरिक मात्र त्याचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे. परभणी शहरात मास्क न वापरता फिरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे संबंधित व्यक्तीस ताब्यात घेऊन रेणुका मंगल कार्यालयात एक दिवसासाठी क्वाॅरंटाइन करण्यात येणार असून, या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणीही केली जाणार आहे.