शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही; नवाब मलिकांचे फडणवीसांवर टीकास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 5:47 PM

बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात.

ठळक मुद्देमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही.

परभणी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम आहे, असे तेथे जावून म्हणायचे आणि येथे मात्र वेगळी भूमिका घ्यायची. महाराष्ट्रात राहून बिहारची स्तुती चालणार नाही. जनतेला आता सर्वकाही कळते आहे. अर्ध्या चड्डीतून फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी टीका अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शुक्रवारी येथे बोलताना केली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याकमंत्री तथा पालकमंत्री नवाब मलिक शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. बिहारमध्ये जावून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारवर सर्वाधिक प्रेम असल्याचे सांगतात अन्‌ महाराष्ट्रात आल्यावर मात्र वेगळेच बोलतात. अर्धी चट्टी घालून एका गावात एक बोलायचं आणि दुसऱ्या गावात दुसरं बोलयाचं हे आता चालणार नाही. ही सवय त्यांनी सोडली पाहिजे. कारण जनतेला आता सर्वकाही कळत आहे. जनता पाहत आहे. अर्ध्या चट्टीतून तुम्ही फुल्ल पॅन्टमध्ये तुम्ही आला आहात, याची जाणीव राहु द्या, अशी सडकून टीका त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. यावेळी पत्रकारांनी एकनाथ खडसे हे तेथूनच तुमच्याकडे आले आहेत ना, असा सवाल केला असता खडसे हे अर्ध्या चट्टीत नव्हते तर चट्टीवाल्यांसोबत होते, असेही ते म्हणाले. 

केंद्र सरकार राज्यावर अन्याय करीत आहेराज्याच्या हक्काची जीएसटीची ३० हजार कोटींची रक्कम केंद्र देत नाही. एनडीआरएफची रक्कम देत नाही. त्यामुळे राज्य शासन आर्थिकदृष्या अडचणीत आले आहे. असे असले तरी कर्ज काढूच परंतु शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊ असेही मलिक म्हणाले.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBiharबिहार