शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

रबीच्या तिसऱ्या आवर्तनासाठी जायकवाडीचे पाणी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST

पाथरी:जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तिसऱ्या आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. १० ...

पाथरी:जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामातील पिकांसाठी तिसऱ्या आवर्तनासाठी सोडण्यात आलेले पाणी परभणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. १० फेब्रुवारीपासून पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्याच बरोबर उन्हाळी हंगामातील पिकांसाठी १ मार्चपासून चार पाणी पाळीचे नियोजन ही जायकवाडी विभागाकडून करण्यात आले आहे.

पैठण येथील जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरल्या नंतर याचा सिंचनासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो. डाव्या कालव्यातून परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील वरखेड येथून जायकवाडीचे क्षेत्र सुरू होते. पाथरी, मानवत, परभणी भागातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होतो.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी या प्रमुख पिकांसोबत कापूस आणि ऊस पिकांसाठी या पाण्याचा लाभ मिळतो. यावर्षी रब्बी हंगामातील पिकांसाठी जायकवाडी विभागाने तीन पाणी पाळ्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी पाहिले रोटेशन २७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, दुसरे रोटेशन ८ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत चालेल. आता जायकवाडी विभागाने तिसऱ्या रोटेशनसाठी डाव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. कमी क्षमतेने पाणी जिल्ह्यात दाखल झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसात पूर्णक्षमतेमे पाणी आल्या नंतर १० फेब्रुवारी पासून सिंचनासाठी पाणी वितरीकेतून थेट शेतकऱ्यांच्या शेतात सोडले जाणार आहे.

६ हजार १०० हेक्टर सिंचन

जायकवाडीच्या डाव्या कलव्यावर रब्बीसाठी ६ हजार १०० हेक्टरवर सिंचन करण्यात आले आहे. जायकवाडीच्या पाण्याने या भागातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी मोठा फायदा झाला आहे.

उन्हाळी हंगामासाठी १ मार्चपासून पाणी सोडण्याचे नियोजन

रब्बी हंगामातील तीन पाणी रोटेशन सोबतच उन्हाळी हंगामातील पिकांना ४ रोटेशन पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ मार्च पासून उन्हाळी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता डी. बी. खारकर यांनी दिली.