शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:31 AM

वृक्ष संवर्धनासाठी पाणी नियोजन गरजेचे परभणी : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, ...

वृक्ष संवर्धनासाठी पाणी नियोजन गरजेचे

परभणी : राज्य शासनाच्या वृक्ष लागवड योजनेंतर्गत आतापर्यंत कोट्यवधी वृक्ष लावण्यात आले आहेत. मात्र, या वृक्षांना पाणी मिळत नसल्याने ही रोपे जागेवरच जळून जात आहेत. त्यामुळे वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी शाश्वत पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे, तरच वृक्ष लागवड मोहीम सार्थकी लागण्यास मदत होईल.

रस्त्यावरील खोदकाम बंद करा

परभणी : शहरातील डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. त्यामुळे रस्ते पुन्हा खड्डेमय होत आहेत. आधीच शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जे रस्ते बऱ्यापैकी चांगले होते, त्या रस्त्यावरही जलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम झाले आहे. त्यामुळे रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली असून वाहनधारकांचा त्रास कायम आहे. त्यामुळे रस्त्यावरील खोदकाम बंद करण्याची मागणी आहे.

परभणी बसस्थानकात चोऱ्या वाढल्या

परभणी : येथील बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेऱ्याअभावी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे आठ दिवसांपूर्वी चोरट्यांनी एका प्रवाशास लुटल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

राष्ट्रीय महामार्गाची चाळणी

सोनपेठ : नव्याने घोषित करण्यात आलेल्या मेहकर- मंठा- पाथरी- सोनपेठ या राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील विटा ते गवळी पिंपरी या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला आहे.

एका खाटेवर दोन रुग्णांवर उपचार

परभणी : जिल्हा रुग्णालयातील स्त्री रुग्णालय, ऑर्थो विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डांमध्ये एका खाटेवर दोन रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर, काही वार्डांमध्ये साफसफाईचाही अभाव दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

विजेअभावी बसतोय कृषिपंपांना फटका

परभणी : उच्च दाब प्रणाली योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३ हजार कृषिपंपांना स्वतंत्र विद्युत रोहित्र त्यांच्या जल स्रोतांवर उभारून देण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांना येणाऱ्या समस्यांतून सुटका मिळणार आहे. मात्र, वीज कंपनीच्यावतीने वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

जिल्ह्यात घरकुलांची बांधकामे अर्धवट

परभणी : शहरातील रमाई आवास आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम रखडले आहे. काही लाभार्थ्यांना वाळूची समस्या निर्माण झाली आहे, तर काही जणांना वेळेत हप्ता मिळाला नसल्याने बांधकाम बंद ठेवावे लागत आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.