शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले; ७० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST

दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ ...

दररोजच्या आहारात आवश्यक असणाऱ्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आतापर्यंत पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महागाई वाढत असतानाच आता त्यात खाद्य तेलानेही उडी घेतली आहे. मागच्या वर्षभरात खाद्यतेल सरासरी ६० रुपयांनी वाढले आहे. जागतिक स्तरावर तेलाची टंचाई निर्माण झाल्याने भाववाढ होत असल्याचे सांगितले जाते.

त्याचप्रमाणे तेलबियांचे कमी असलेले उत्पादन हेही त्यासाठी एक कारण आहे. काहीही असले तरी बाजारपेठेत तेलाचे भाव कमालीचे वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दररोजच्या जेवणात तेलाचा वापर होतो. मात्र भाववाढीमुळे हे तेलच गायब करण्याची वेळ आता आली आहे.

सतत या न त्या कारणाने महागाई वाढत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि सूर्यफूल या दोन तेलांचा सर्वाधिक वापर होतो. मागील वर्षी मार्च महिन्यात सूर्यफूल तेल १०६ रुपये किलो या दराने विक्री झाले होते. याच तेलाचे दर आता १६७ रुपयांवर पोहोचले आहेत. वर्षभरात तेलाच्या किमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत, तर मागील वर्षी ९७ रुपये किलो या दराने विक्री होणाऱ्या सोयाबीन तेलाचे दर यावर्षी मात्र १४० रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे महागाईत तेलाने भर टाकली आहे.

तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने किराणावर महिन्यासाठी नियोजित केलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च होत आहे. त्यामुळे घरातील महिन्याचे आर्थिक बजेट विस्कळीत होत आहे. तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम अन्य खाद्यपदार्थांवरही होत असून, महागाई वाढत आहे.

-सुनीता दामोशन, गृहिणी

इंधनाच्या दरापाठोपाठ आता खाद्यतेलांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा परिस्थितीत घरातील आर्थिक नियोजन लावताना तारांबळ उडते. तेलासह मागच्या काही महिन्यांपासून गॅसच्या किमतीही तेवढ्याच वाढल्या आहेत. शासनाने तेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.

-आरती वाघ, प्रतिक्रिया

वर्षभरात तेलाच्या किमतीत थोडीफार वाढ झाली तरी काही तरी पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते. मात्र ६० रुपयांनी तेलाच्या किमती वाढल्याने महिनेवारी खर्चावर त्याचा परिणाम होत आहे. वाढत चाललेल्या महागाईच्या सर्वाधिक झळा मध्यमवर्गीय कुटुंबीयांना सहन कराव्या लागत आहेत.

-गृहिणी, प्रतिक्रिया

तेलबियांचे कमी झालेले उत्पादन आणि जागतिक स्तरावर तेलाची कमतरता असल्याने भाववाढ होत आहे. तेलाची आयात करावी लागू नये, यासाठीही देशात तेलाच्या किमती वाढवून तेलबियांचे उत्पादन वाढविण्याचा धोरण असू शकते.

-अशोक जैन, व्यापारी