शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

शासनाच्या खरेदी निकषात शेतकरी अडकल्याने व्यापा-यांची चांदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:18 IST

जिल्ह्यात शासनाच्या वतीने ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या वतीने शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अटीमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही.

ठळक मुद्देखरेदी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अटीमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही.हमी भावाने केवळ ८१ क्विंटल शेतमालाची खरेदीव्यापा-यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी

परभणी : जिल्ह्यात शासनाच्या वतीने ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहेत. परंतु, शासनाच्या वतीने शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी टाकण्यात आलेल्या अटीमुळे ६ पैकी पाच खरेदी केंद्राकडे शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक निकषाच्या फे-यात अडकल्याचे दिसून येत आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीन, मूग, उडीद ही पिके जोमात बहरली. यातून शेतक-यांना चांगले उत्पन्नही मिळाले. परंतु, शेतक-यांचा शेतमाल बाजारपेठेत आल्यानंतर खाजगी व्यापा-यांकडून शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाकडे पाठ फिरवून कवडीमोल दराने खरेदी केला जावू लागला. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संतप्त झाला. त्यानंतर शासनाने जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, मानवत, गंगाखेड, सेलू, पूर्णा या सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र उघडण्यात आले. त्यामुळे या केंद्राच्या माध्यमातून तरी शेतक-यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावर शेतक-यांचा माल विक्रीसाठी कीचकट अटी व नियम टाकण्यात आले. 

यामध्ये सर्व प्रथम शेतक-यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे आपल्या शेतमालाची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. तसेच परभणी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी १ हेक्टरमधील केवळ ९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात येणार आहे. तसेच पूर्णा तालुक्यातील शेतक-यांसाठी ९ क्विंटल ५० किलो, पालम तालुक्यातील शेतक-यांसाठी ७ क्विंटल ५० किलो, गंगाखेड तालुक्यातील शेतक-यांसाठी ८ क्विंटल ७० किलो, सोनपेठ ८ क्विंटल ८ किलो, पाथरी ६ क्विंटल, मानवत १० क्विंटल, सेलू १० क्विंटल आणि जिंतूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे १ हेक्टरामधील ८ क्विंटल ८० किलोच सोयाबीन हमीभाव केंद्रामार्फत खरेदी करण्यात येणार आहे. ज्या शेतक-यांकडे उपलब्ध पाणी होते व ज्या शेतक-यांना एका हेक्टरमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न झाले आहे. अशा सोयाबीन उत्पादक शेतक-यांची मात्र गोची झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सहाही ठिकाणी १५ दिवस झाले हमीभाव खरेदी केंद्र शेतक-यांचा शेतमाल खरेदी करण्यासाठी उघडण्यात आले आहेत. परंतु, शासनाने हा माल खरेदी करताना टाकण्यात आलेल्या अटी व नियमांमुळेच जिल्ह्यातील परभणी केंद्र वगळता जिंतूर, मानवत, गंगाखेड, सेलू, पूर्णा या पाच केंद्राकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी फिरकलाच नाही. त्यामुळे शासनाने टाकण्यात आलेल्या अटी व निकषाचा पुन्हा एकदा विचार करुन सरसगट सोयाबीनची खरेदी करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतक-यांतून होत आहे.

केवळ ८१ क्विंटल शेतमालाची खरेदी

शासनाच्या वतीने जिल्ह्यातील शेतक-यांचा शेतमाल किमान आधारभूत किंमतीने खरेदी करण्यात यावा, यासाठी जिल्ह्यातील ६ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले आहे. यातील परभणी येथील खरेदी केंद्राचा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या हस्ते शुभारंभही करण्यात आला. खरेदी केंद्र उघडून १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. या कालावधीत केवळ सेलू येथील ३९ क्विंटल मुगाची तर ४ क्विंटल १८ किलो उडदाची खरेदी झाली आहे. त्या पाठोपाठ परभणी केंद्रावर २९ क्विंटल मूग व ९ क्विंटल सोयाबीन असे एकूण जिल्ह्यातील ६ केंद्रांपैकी दोनच केंद्रावर १५ दिवसांत केवळ ८१ क्विंटल शेतमालाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या निकषात पुरता अडकल्याचे दिसून येत आहे.

व्यापा-यांकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी

शासनाने सुरु केलेल्या हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतक-यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. परंतु, एकट्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात दीड महिन्याच्या कालावधीत खाजगी व्यापा-यांकडून तब्बल १२ हजार क्विंटल सोयाबीनची हमीभावविना खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ शासनाने टाकलेल्या अटी व निकषामुळेच शेतक-यांना आपला शेतमाल कवडीमोल दराने खाजगी व्यापा-यांच्या घशात टाकावा लागत आहे.  त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांमध्ये शासनाविरुद्ध मोठी नाराजी दिसून येत आहे.

गतवर्षीच्या तुलनेत कापसाला कमीभावपरभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने गतवर्षी १७ नोव्हेंबर २०१६ पासून कापसाची खरेदी सुरु केली होती. गतवर्षी कापूस उत्पादक शेतक-यांना  खरेदीच्या पहिल्याच दिवशी जवळपास ५ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळाला होता. गतवर्षी एकट्या परभणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरेदी- विक्रीतून २०० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. परंतु, ९ नोव्हेंबर २०१७ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात झालेल्या जाहीर लिलावात पहिल्याच दिवशी ४ हजार ३२५ तर ४ हजार ५५१ असा भाव मिळाला. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद या शेतमालाबरोबरच आता कापूस उत्पादक शेतकºयांनाही आपला कापूस कवडीमोल दराने विकावा लागतो की काय? असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी