शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

घरात बसून असलेल्या ज्येष्ठांनाच कोरोनाचा सर्वाधिक धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:14 IST

परभणी : कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी संचारबंदी लावून विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असला तरी घरातच ...

परभणी : कोरोनाच्या संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी संचारबंदी लावून विनाकारण घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला असला तरी घरातच बसून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनाच या कोरोनाचा सर्वाधिक धोका झाल्याची बाब आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटेत मिळून ६१ ते ७० वर्षे वयोगटातील ४ हजार ७१० नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यातील ३३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याच वयोगटात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून जिल्हावासीय त्रस्त आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संसर्ग कमी झाला असला तरी मागे वळून पाहिले तर ज्येष्ठ नागरिकांनाच कोरोना सर्वाधिक धोकादायक ठरल्याचे दिसते.

शासकीय आणि इतर सेवांमधून सर्वसाधारणपणे ६० वर्षांनंतर सेवानिवृत्ती होते. त्यानंतरचा काळ हा निवृत्तीचा काळ असतो. जबाबदाऱ्या कमी झाल्याने शक्यताे या वयोगटातील नागरिक घराबाहेर पडत नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली. आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आदेश दिले. मात्र, जे नागरिक घराबाहेर पडले, त्यांच्यापेक्षाही अधिक घराबाहेर न पडणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा संसर्ग धोकादायक ठरला आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ६१ ते ७० या वयोटात सर्वाधिक ३३० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इतर वयोगटाच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्या खालोखाल ५१ ते ६० या वयोेगटातील ७ हजार २२४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील २९७ रुग्णांचा मृत्यू झाला. ७१ ते८० या वयोगटात १ हजार ७९३ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ ते ५० या वयोगटातील ८ हजार ८८१ नागरिकांना कोरोना संसर्ग झाला असून, त्यातील १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूची संख्या पाहता ६१ ते ७० वयोगटासाठी दोन्ही कोरोना लाटा धोकादायक ठरल्याचे दिसते.

शंभरीपुढील नागरिकांनी मात्र घडविला आदर्श

ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कोरोनाची लाट धोकादायक ठरली असली तरी १०० वर्षांपुढील नागरिकांनी मात्र आपली प्रतिकारक्षमता या काळातही सिद्ध करून दाखविली आहे. १०१ ते १३० या वयोगटातील ५२ नागरिकांना कोरोना झाला होता. त्यातील २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता, ३.८५ टक्के एवढे आहे. तर ६१ ते ७० वयोगटातील मृत्यूचे प्रमाण ७.०१ टक्के आहे. ९१ ते १०० या वयोगटात मात्र मृत्यूचे प्रमाण ११.६३ एवढे सर्वाधिक आहे.

३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक बाधित

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३२५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ३१ ते ४० या वयोगटात सर्वाधिक १० हजार ८६० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर ० ते १० वर्षे या बालकांच्या वयोगटात सर्वात कमी १ हजार ४२४ रुग्ण नोंद झाले आहेत.