शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी'; आपल्या पूर्वजांच्या त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 15:04 IST

Governor Bhagat Shingh Koshyari's Parabhani visit : अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे

ठळक मुद्देकृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यानवा देश घडविण्यासाठी कृषीचे योगदान महत्वपूर्ण

परभणी : नवा देश घडविण्यासाठी कृषी क्षेत्राचे योगदान महत्वपूर्ण आहे. 'उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी', असे आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे. त्याचीच अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असून, सर्वांनी जोमाने कामाला लागावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यांनी आज दुपारी येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात  त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील संशोधक, अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. 

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी आंचल गोयल, कुलगुुरु डॉ. अशोक ढवण व राजभवनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमास पोलीस अधीक्षक जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ.देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राज्यपाल कोश्यारी यांनी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मते जाणून घेतली. त्यावर डॉ.सय्यद इस्माईल, डॉ. उदय खोडके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ.स्मिता सोळंकी, प्राचार्या जया बंगाळे, डॉ. एस.पी. म्हेत्रे यांनी विविध विषयांकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. 

'चांगले काम करून आयुष्यात यशस्वी व्हा'; राज्यपालांचा विद्यार्थ्यांना कठीण परिश्रमाचा सल्ला

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, भारतीय स्वातंत्र्याचे अमृतोत्सवी वर्ष आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी आहे. जास्तीत जास्त प्राध्यापकांची नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे; परंतु, कमी मनुष्यबळात आणि कमी सुविधांमध्ये अधिक चांगली कामे झाली आहेत. अध्यापक मंडळी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक असतात. त्यामुळे अध्यापकांना कृषी व संबंधित विषयांमध्ये दुप्पट कामे करावे, असे आवाहन त्यांनी केले. कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी एकाच ठिकाणी परवाने मिळतील, अशी व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कृषी क्षेत्रात पेटंट वाढविण्यावर भर द्यामराठवाडा विभागात कृषी क्षेत्रातील पेटंटचे प्रमाण कमी आहे. त्या त्या भागातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि वाणांचे पेटंट वाढवून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यास कृषी क्षेत्राला चालना मिळेल, तेव्हा अधिकाधिक पेटंटवर भर द्यावा, असा सल्लाही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिला. प्रारंभी कुलगुुरू डॉ. अशोक ढवण यांनी कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा सादर केला. विद्यापीठाच्या वतीने कुलगुुरू डॉ. ढवण यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. रणजीत चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीparabhaniपरभणीVasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeethवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ