शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पात्र नसताना घेतला योजनेचा लाभ; १४४ शेतकऱ्यांना पैसे भरण्याची दुसऱ्यांदा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 15:29 IST

मानवत तालुक्यात पात्र नसताना अनेक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते

ठळक मुद्देसर्व ३९१ लाभार्थ्यांनी घेतलेली मदतीची रक्कम वसूल करण्याचे आदेशआयकर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आपली नावे यादीत समाविष्ट केली.

मानवत : प्रधानमंत्री किसान योजनेसाठी पात्र नसतानाही या योजनेत समाविष्ट होऊन शासनाकडून मदतीची रक्कम घेणाऱ्या मानवत तालुक्यातील १४४ आयकरदात्या शेतकऱ्यांना महसूल विभागाच्यावतीने दुसऱ्यांदा घेतलेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्याची नोटीस बजावली आहे.

पीएम किसान योजनेंतर्गत अपात्र असतानाही अनेक शेतकऱ्यांनी खोटी माहिती देऊन शासनाकडून अनुदानाची रक्कम घेतल्याची बाब समोर आली होती. अशा सेलू तालुक्यातील ३९१ शेतकऱ्यांची यादी आयकर विभागाने महसूल विभागाला दिली होती. त्यामध्ये या लाभार्थ्यांनी स्वत:ची नावे पीएम किसान योजनेत समाविष्ट करून दोन हजार रुपयांप्रमाणे ३४ लाख ८६ हजार रुपयांची रक्कम उचलली होती. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांनी घेतल्याचेही समोर आले. तसेच निवृत्ती वेतन धारकांचे दरमहा निवृत्ती १० हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास तेही या योजनेसाठी अपात्र ठरतात. त्यांनीही याबाबत खोटी माहिती दिली. शिवाय डॉक्टर्स, इंजिनअर्स, वास्तू विशारद आदी व त्यांचे कुटुंबीय या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत, त्यांनीही या योजनेतून शासनाकडून मदतीची रक्कम घेतली. 

या सर्व ३९१ लाभार्थ्यांनी घेतलेली मदतीची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले होते. त्यानंतर २४७ शेतकऱ्यांनी २३ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम शासनाला परत केली आहे. उर्वरित १४४ शेतकऱ्यांनी १४ लाख ४६ हजार रुपयांची रक्कम अद्यापही परत केलेली नाही. त्यामुळे या रकमेच्या वसुलीसाठी दुसऱ्यांदा नोटीस काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्या शेतकऱ्यांनी ही रक्कम परत न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार तहसील प्रशासनाने या १४४ शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. आता हे सधन शेतकरी शासनाला पैसे परत कधी करतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शेती नावावर असल्याने घेतला लाभगरजू शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र शासनाने काही निकषांच्या आधारे या योजनेतील लाभार्थ्यांना वर्षभरात ६ हजार रुपये मदत देण्याचे जाहीर केले होते. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या शेतकऱ्यांना वगळण्यात आले होते. शिवाय नोकरी, व्यवसाय, १० हजारांपेक्षा अधिक निवृत्ती वेतन असणाऱ्या शेतकऱ्यांनाही वगळले होते. असे असताना आयकर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी आपली नावे यादीत समाविष्ट केली. त्यातून मदतीची रक्कम उचलल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी