शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच वर्षात विमा कंपनीचा १५० कोटींचा नफा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:13 IST

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स ...

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पेरणी केलेल्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी पंतप्रधान विमा योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स विमा कंपनीचे तीन वर्षांसाठी केंद्र शासनाने परभणी जिल्ह्यासाठी निवड केली. २०२०-२१ या पहिल्या वर्षी जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके या विमा कंपनीकडे संरक्षित केली. त्यासाठी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६३२४ रुपयांचा विमा हप्ता कंपनीकडे भरला. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर-२०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस या पिकांचे ९० टक्के नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून प्रति हेक्‍टरी राज्य शासनाने ८ हजार ६०० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना अदा केले. मात्र विमा कंपनीने शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीला कळविले नाही ही आडकाठी टाकून विमा देण्यास नकार दिला. जिल्ह्यातील १ लाख ४० हजार ३०१ शेतकऱ्यांना ८७ कोटी ३२ लाख ४९ हजार रुपयांचे वाटप केले. मात्र परभणी जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान पाहून या विमा कंपनीने २०० ते ३०० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देणे अपेक्षित होते. मात्र लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन व कृषी विभागाचा पाठपुरावा कमी पडल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचा विमा मिळाला नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी भरलेले ३२ कोटी ९० लाख, राज्य व केंद्र शासनाचे असे एकूण जवळपास २४० कोटी रुपये जमा झाले. यातील विमा कंपनीने केवळ ९० कोटी रुपयांचे वाटप जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले. त्यामुळे या विमा कंपनीला एकट्या परभणी जिल्ह्यातून दीडशे कोटी रुपयांचा पहिल्याच वर्षी नफा झाल्याचे दिसून येत आहे.

मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांची पाठ

विमा कंपनीने १५ जुलैपर्यंत २०२१-२२ या खरीप हंगामातील पिके संरक्षित करण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत ४ लाख ९१ हजार ६६३ शेतकऱ्यांनी २ लाख ७९ हजार ६०० हेक्टरवरील पिके संरक्षित केली. त्यापोटी २३ कोटी ६३ लाख रुपयांचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग केला आहे. त्यामुळे गतवर्षी पेक्षा यावर्षी १५ जुलैअखेर ३ लाख शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.