शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार क्विंटल सोयाबीनची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार ...

दरवर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्र खरीप व रबी हंगामावर अवलंबून असते. त्यानुसार शेतकरी पेरणीसाठी नियोजन करतात. यावर्षी सोनपेठ तालुक्यात ३५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. पेरणीनंतर पावसाने योग्य हजेरी लावल्याने पिके जोमात आली होती. मात्र, सोयाबीन, कपाशी काढण्याच्या अवस्थेत असतानाच बदलत्या वातावरणाचा फटका या पिकांना बसला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका काढणीसाठी आलेल्या कापूस, सोयाबीन या पिकांना बसला. यामुळे लागवडीचा खर्चही निघाला नाही. अशाही परिस्थितीमध्ये सोयाबीन व कपाशीचे पीक घेतले आहे. त्याची आवक येथील बाजार समितीमध्ये झाली असून, ऑक्टोबर महिन्यात ४ हजार ३०९ क्विंटल, नोव्हेंबर महिन्यात ५ हजार २२५ क्विंटल तर २१ डिसेंबरपर्यंत ८०४ क्विंटल अशी एकूण ११ हजार ५७५ क्विंटलची आवक झाली आहे. सोयाबीनचा उठाव वाढल्याने सोयाबीनच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले. केंद्र शासनाने सोयाबीनला ३ हजार ८८० रुपयांचा हमीभाव घोषित केलेला आहे; परंतु व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची हमीभावापेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे. आतापर्यंत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ४ हजार ३०० रुपयांपर्यंत सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

मागील वर्षी १८ हजार क्विंटलची आवक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात १८ हजार ५२५ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. यावर्षी मात्र खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक निसर्गाच्या तडाख्यात भुईसपाट झाले. त्यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी तब्बल ७ हजार क्विंटल सोयाबीनची आवक घटली आहे.