शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तू मी आणि ‘तो’? मोबाईलमुळेच आमचं ब्रेकप झालं, असं का म्हणतात तरुण जोडपी?

By admin | Updated: January 8, 2015 20:34 IST

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर,

‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ असं मी कितीदा सांगतो तिला, ना आपली ओळखपाळख, जणू काही भेटलोय आयुष्याच्या एखाद्या वळणावर, अनोळखी, पुन्हा नव्यानं समजून घेऊ स्वत:ला, हा ‘अतीओळखीचा’ बोजा उतरवून ठेवता येईल का आपल्याला?’
-असं मी कितीदा विचारतो तिला ; खरंतर तर तिलाही तसंच वाटतं! पण ती म्हणते, ‘बरं झालं ना, आपल्याला एकमेकांचा खरा चेहरा तरी दाखवला या मोबाईलनं, या रोमॅण्टिसिझमपेक्षा मी हे वास्तव स्वीकारीन की नाहीयोत आपण एकमेकांना साजेसे.’
मला प्रश्न पडतो की, मग असं आमच्यात काय होतं की आम्ही एकमेकांना इतके आवडलो होतो की, गेले दोन वर्षे आम्ही एकमेकांशी रात्रंदिवस बोलतच सुटलो होतो, आणि आता शब्दांसह भावनांचा एकदम दुष्काळ पडला.’
अजिंक्या नावाच्या एका मित्रानं पाठवलेली ही ईमेल.
खरंतर अजिंक्यानं सांगितलं त्याहून वेगळं अनेक पत्रात काहीच नव्हतं. कळकळून लिहिलेल्या अनेक कहाण्या, वाचताना अस्वस्थ करणार्‍या. अनेक पत्रं वाचताना वाटलं की, आपण एखाद्या सुंदर लव्हस्टोरीची काही पानं वाचतो आहोत आणि मग एकदम व्हिलनची एण्ट्री व्हावी आणि त्यानं त्या लव्हबडर्सला एकदम शत्रू बनवावं तशी कहाणी टर्न मारते.
पण व्हिलन तरी कसं म्हणणार मोबाईलला, कारण त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, ती वाढ एकदम कॅन्सरस झाली, त्याचा दोष त्याला द्यायचा?
पण ही बहुतांश पत्रं मात्र आपल्या मोबाईलला म्हणजेच पर्यायानं आपल्या मोबाईलवरच्या बोलण्याला आणि त्या मोबाईलमुळे झालेल्या विश्‍वासघातालाच सारा दोष देतात.
त्या दोषांच्या कारणांवरची पुटं जरा  खरवडून काढली की दिसतात, या तरुण जोडप्यांनीच सांगितलेली ब्रेकपची खरी कारणं, आणि झालेला घोळ.
१)अनेकांना एकमेकांशी बोलण्याची ‘सवय’ लागते. व्यसनी माणसाचं होतं तसंच, मोबाईल अँडिक्शन, आपण एकटे नाही, कुणीतरी सोबत आहे, ‘आपलं’ आहे, या भावनेनं ते बोलत राहतात.भांडणं झाली तरी बोलतात, कारण ती भांडणसुद्धा आपण ‘एकाकी’ नाही, आपल्या जगण्यात काहीतरी मोठं आहे ही भावना पुरवतात. पण एकाचंच असं होत असेल तर दुसरा त्या नात्याला विटतो.
२) अनेकांना वाटतं, भेटायचं कशाला? आपण तासंतास फोनवर बोलतो, मेसेज, व्हॉट्सअँप करतो, भेटून आणि वेगळं काय बोलणार? आणि भेटलं की, फोनवर बोलणार्‍या व्यक्तीपेक्षा प्रत्यक्षातला माणूस वेगळा वाटतो, काही बोलणंच होत नाही, परस्परांविषयी आकर्षण वाटत नाही.असलेली ओढ कमी होते.
३)इतर मित्रमैत्रिणी, त्यांच्याशी असलेली जवळीक, कुणातरी एका मित्राविषयी किंवा मैत्रिणीविषयी असलेली ओढ आपल्या नात्यात अडसर दोघांपैकी एकाला ( प्रसंगी दोघांना) वाटू लागतो. ती नाती तोडण्यासाठी दबाव टाकला जातो, इमोशनल ब्लॅकमेलिंग होतं, त्यातून भांडणं, अबोले, स्वातंत्र्यावर आक्रमण ही भावना आणि मग नको होतं नातं.
४) चोवीस तास कनेक्टेड असल्यानं अनेकजण खूप पझेसिव्ह होतात. इतके की दुसर्‍यानं श्‍वासही घेतला तर आपल्याला सांगावं असा विचार करतात. त्या पझेसिव्हनेसचा आणि चोवीत तास आपल्यावर वॉच आहे, या भावनेचा त्रास होऊ लागतो.
५) आता तर अनेकजण रोज काय घालायचं, सिनेमाला जाताना काय, स्वयंपाक काय केला इथपासून ते आपल्या इंटिमेट क्षणांपर्यंत अनेक गोष्टींचे फोटो किंवा क्लिप काढून एकमेकांबरोबर शेअर करतात, भांडणं वाढली की ते सारं घरच्यांना दाखवीन किंवा व्हायरल करीन म्हणून धमक्याही देतात. न उरलेलं नातं खेचत राहतात.