शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात, स्वत:शीच बोलावं असं काही तरी

By admin | Updated: February 5, 2015 19:50 IST

बागेत जा, एखाद्या गुलाबाच्या झाडाला, एखाद्या मोगर्‍याच्या रोपट्याला विचारा, ‘कंटाळा कसा येत नाही तुला

नदी फूल देव आणि आपण

 
बागेत जा, एखाद्या गुलाबाच्या झाडाला, एखाद्या मोगर्‍याच्या रोपट्याला विचारा,
‘कंटाळा कसा येत नाही तुला, सारखी तीच ती फुलं. त्याच त्या रंगाची, त्याच त्या वासाची. वर्षांनुर्वे तेच. उपयोग काय त्याच त्या गोष्टीचा.’
ते झाड हसेल. म्हणेल, ‘अरे, कंटाळा कसा येईल? ही फुलं फुलवणं. सुगंध वाटणं, सुंदर दिसणं आणि आपण सुंदर आहोत, हेच आपलं काम हे मान्य करणं, हेच माझं जगणं म्हणून स्वीकारणं, यात कंटाळा यायचं काय कारण आहे.’
आपण गप्पं बसावं आणि सरळ एखाद्या नदीकाठी जावं. तिचा तोच खळखळाट, तोच प्रवाह. आपण विचारावं तिला, ‘कशाला इतकी उधाणतेस? उपयोग काय तुझ्या उधाणाचा, या खळखळून वाहण्याचा, या खळखळाटाचा? आणि एवढं करून करतेस काय तर ठरलेल्या वाटेनं वाहत शेवटी सम्रुद्राच्या खार्‍या पाण्यात हरवूनच जातेस ना.?’
नदी खळाळून वाहत म्हणेल, ‘मी ‘उपयोगी’ बनण्याचा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करतेय असं कोण म्हणालं, मी नदी आहे आणि मी फक्त नदीसारखं वागण्याचा प्रयत्न करतेय इतकंच.’
आणि मग संतापून देवालाच विचारावं, कशाला रे हा एवढा घोळ घालून ठेवलास, उपयोग काय या सार्‍याचा.
तो म्हणेल ‘ उपयोग नाही कसं? माझ्यादृष्टीनं तर झाडावरून पडणारं प्रत्येक पानही महत्त्वाचं आणि उपयोगीच आहे. तुझ्या डोक्यावरचा केस आणि हवेतला डोळ्यांनी न दिसणारा जीवाणूही त्याचं त्याचं कामच करतोय. ’
मग आपण स्वत:लाच विचारावं, ‘पण माझं काय, माझा आहे काही उपयोग? मी कशाला जगतोय.?’
खरं सांगू जे नदीनं, जे फुलझाडानं, जे देवानं सांगितलं ते लक्षात ठेवलं तर हा प्रश्नच पडणार नाही.
‘आपण ‘युजफूल‘-उपयुक्त आणि उपयोगी व्हायचा प्रयत्न करणं सोडून, आपण ‘आपण’ म्हणून सहज जगायल लागलं पाहिजे, त्या जगण्याचा होईलच कुणाला न कुणाला उपयोग. म्हणून मग आपण जसे आहोत तसे जगावं, आपण कशाला गुलाब व्हायचं, नदी व्हायचं नी देव व्हायचं, आपण जे आहोत ते जगलो. की, जगलोच आपण आपल्या आनंदासाठी!
-सुप्रसिद्ध लेखक पाऊलो कोईलो 
यांच्या ब्लॉगवरची एक नोंद