शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल ईश्क’; तरुण मुलींना काय ‘नकोसं’ वाटतं?

By admin | Updated: January 8, 2015 20:37 IST

मुळात कुणीतरी आपल्या प्रेमात पडलंय, आपण कुणाला तरी आवडतोय, या भावनेनंच ती आनंदून गेलेली असते. त्यात सुरुवातीला ती काही स्वत:हून त्याला फोनबिन करत नाही.

ठोंब्या, ढोंग करतो.
 
मुळात कुणीतरी आपल्या प्रेमात पडलंय, आपण कुणाला तरी आवडतोय, या भावनेनंच ती आनंदून गेलेली असते. त्यात सुरुवातीला ती काही स्वत:हून त्याला फोनबिन करत नाही. तोच तिला सतत फोन करतो. काहीबाही विचारतो, इकडून तिकडून आलेला एखादा मेसेज फॉरवर्ड करतो. तिच्या आवडीचं गाणं लागलं तर त्यातली एखादी ओळ तिला लिहून पाठवतो,  त्यातून बरंच काही ‘सुचवतं’. तिला आवडणारे रंग, तिला आवडणारी फुलं, तिला आवडणारी गाणी, असं जे जे म्हणून तिला इम्प्रेस करायला आवश्यक ते सारं करतो.
हा माणूस आपल्याला किती जपतो, किती काळजी घेतो, आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट न सांगताच कशी काय ओळखतो, याचं तिला अप्रूप वाटू लागतं. त्यात ती जे म्हणेल ते तो ऐकतो, तिनं फोन ठेवायचा प्रयत्न केला तर हटून बसतो आधी तू फोन ठेव, मी नाही ठेवणार.
हे सारं सुरुवातीचे काही महिने चालतं, तोपर्यंत ती कमीच बोलत असते. मग हळूहळू ती ‘मोकळी’ होते, ‘बोलकी’ होते. त्याचे फोन एव्हाना तिला सवयीचे झालेले असतात, आणि मग त्याचा फोन आला नाही की, ती सैरभैर होते. वेड लागल्यासारखी अस्वस्थ होते. सतत त्याला फोन करते.
नेमके त्याचकाळात त्याचे फोन आणि मेसेजेस आटतात. इकडे तिच्या मैत्रिणी तिला सांगतात की, बघ तू ‘पटली’ असं वाटल्याबरोबर तो तूला इग्नोर करायला लागलाय. आज किती फोन केले त्यानं दिवसभरात?
आता त्याच्या कॉल्सची संख्या मोजणं सुरू होतं? किती वेळ आणि काय बोलला याचं मोजमाप मनातल्या मनात सुरू होतं.
आणि ते कमी होतोय असं वाटलं की, आपण इनसिक्युअर होतो, तो असं का वागतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तसतसा तो जास्तच लांब जातो. मुद्दाम फोन घेणं टाळतो असं अनेक मुलींची पत्रं सांगतात.
का आपली फोनवर त्याच्याशी भांडणं होतात आणि का त्या ठोंब्याला आपण चुकीचं वागतोय, गृहित धरतोय हिला हे कळत नाही, असं वाटून मुलींची प्रचंड चिडचिड होते.
आपण फसवले जातोय, आपल्याला जेव्हा त्याची गरज आहे तेव्हा तो आपल्याशी बोलत नाही, त्याला वाटेल तेव्हाच करतो, फार गृहित धरतो अशी मुलींची भावना होते.
त्या भावनेतूच त्याचं काय चुकतं, याची मुलींच्या पत्रातून हाती येणारी ही यादी.
१) त्याचा फोन आला की आपण लगेच तो घ्यायला हवा, एकदोनदा कॉल मिस झाला तरी त्याला राग येतो. लगेच टोमणा मारतो की, एवढं काय करत होतीस महत्वाचं?
नाहीतर मग आपण कॉल केल्यावर चिडून फोनच उचलत नाही. त्याचा प्रचंड त्रास होतो. तू कामात असतोस, मी रिकामटेकडी असते का?
२) फोन न उचलणं हा तर आजारच. एरव्ही जेव्हा पहावं तेव्हा मोबाईल हातातच असतो, सतत अँँग्री बर्ड नाहीतर कॅण्डी क्रश. आम्ही भेटलो तरी बोटांनी टुकटूक चालूच. काहीही बोला, ऐकतोय की नाही कळतंच नाही. बोललो तर म्हणतो, कान उघडे आहेत माझे ऐकतोय मी, तू बोल. म्हणजे थोडक्यात काय आमच्या बोलण्याला काही किंमतच नाही. आणि एरव्ही मात्र हा कधीही फोनच उचलणार नाही, विचारलं तर सांगणार, मोबाईल कुठं तरी लांब होता, कळलंच नाही! किती ढोंग करणार?
३) प्रचंड थापा मारणार? मी काय मोबाईल मित्राकडेच विसरलो, बॅलन्सच नव्हता, पॅण्टच्या खिशात होता, पॅण्ट कपाटात ठेवली गेली, बॅटरीच संपली, वेळच नव्हता, लक्षातच आलं नाही, सतराशे साठ कारणं. एक फोन नाही करता येत मग वेळेत मित्राच्या मोबाईलवरुन, एक रुपयाच्या डबड्यावरुन. आम्ही फोनची वाट पाहणार, तासंतास, दिवसेंदिवस फोन नाही, लागला आणि विचारलं की भांडण सुरू.तू सतत प्रश्नच विचारते म्हणून.
४) तो व्हॉट्सअँपवर ऑनलाईन दिसतो, फेसबूकावर लायका ठोकतो, कमेण्टा मारतो, आणि आपल्यालाच फोन करायला त्याला फुरसत नसते, यावर कोण मुर्ख विश्‍वास ठेवेल?
५) बरं, फोन करा.तो म्हणणार बोल.अरे काय बोल, तू पण बोल ना काहीतरी, सांग, तुझं काय चाललंय, काय केलं आज, पण नाही. काहीच बोलणार नाही. नुस्तं हं हं हं करत राहणार,  कंटाळा येतो असं भींतीशी बोलण्याचा, मग डोकं सटकणार नाही तर काय होईल?
६) मित्रांशी ढिगानं बोलता येतं, मित्रांशी सगळं शेअर होतं, पण मला काही सांगायची वेळ आली की, लगेच तू नको पडूस त्याच्यात, माझं मी पाहून घेईन.पाहून घेईन म्हणजे, आणि तुझं तू.मग हे प्रेमबिम सब झुठ का?
७) त्याला सोयीच्या वेळेस आपण रोमॅण्टिक व्हायचं, म्हणजे त्यानं रोमॅण्टिक काही मॅसेज केला, तो गोडगुलाबी बोलायला लागला की, आपण तसंच बोलायचं, आपण काय यंत्र आहे का? म्हणजे त्याला माझ्या फिलिंग्ज कधी कळणार नाही,प ण त्याचा मूड असला की लगेच रोमान्स सुरू, नाही जमणार!
८) सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं दुटप्पी वागणं, सुरुवातीला  जे त्याला आवडायचं ते आता आवडत नाही. आधी म्हणायचा, तू बोलत रहावंसं, मी ऐकत रहावंसं वाटतं. आता फोन उचलला की, सूर असा की, ठेव एकदाचा फोन.
९) आपण काहीही विचारा, त्याला उलटतपासणीच वाटते. मग भल्या माणसा तूच मोकळेपणानं काय ते सांगून टाकत जा ना, पण नाही घशात बोळा कोंबाळा तसा मख्खं.काही सांगत नाही. बाहेरुन कळलं की, संताप होतोच.
१0) यासार्‍यातून मुलींची मुलांशी सतत अखंड भांडणं होतात. त्या प्रचंड रडतात. आतल्या आत कुढतात. दिवस दिवस जेवत नाही, कुणाशी बोलत नाही, घरच्यांशी भांडतात, त्यांच्यावर राग काढतात.आणि सतत अस्वस्थ, रेस्टलेस असतात. आणि प्रचंड कडवट, एकारल्या बनत जातात.त्याही संपलेल्या आणि हरलेल्याच दिसतात.