शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा - शुक्ला

By admin | Updated: November 29, 2015 01:32 IST

भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले.

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान पुन्हा एकदा क्रिकेट संबंध सुरळीत करण्यासाठी सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे, असे बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी राजीव शुक्ला यांनी सांगितले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला पुढील महिन्यात श्रीलंकेत आयोजित संभाव्य मालिकेसाठी यापूर्वीच त्यांच्या सरकारचा हिरवा कंदील मिळालेला आहे, तर भारताला अद्याप सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. शुक्ला म्हणाले, ‘आम्ही यापूर्वीच मालिकेबाबत मंत्रालयाकडे अर्ज सादर केलेला आहे, पण विदेश मंत्री सुषमा स्वराज राष्ट्रकुल संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी माल्टा येथे गेल्या असल्यामुळे त्या परतण्याची प्रतीक्षा करीत आहोत. स्वराज मायदेशी परतल्यानंतर याबाबत निर्णय होईल.’भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आयोजित संभाव्य मालिकेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंकेने पुढाकार घेतला आहे. ही मालिका १५ डिसेंबर ते जानेवारीचा पहिला आठवडा या संभाव्य कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. या मालिकेत तीन वन-डे आणि दोन टी-२० सामने होण्याची शक्यता आहे. उभय संघांदरम्यान २००७ पासून कसोटी क्रिकेट खेळले गेलेले नाही. पाकिस्तानने २०१२-१३ मध्ये मर्यादित षटकांच्या छोटेखानी मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. (वृत्तसंस्था)दोन बोर्डांनी (बीसीसीआय व पीसीबी) यापूर्वीच मालिकेबाबत निर्णय घेतलेला आहे. आता निर्णय भारत सरकारला घ्यायचा आहे. आम्हाला सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. खेळाची राजकारणासोबत सरमिसळ करू नये. सरकारच्या सहमतीशिवाय आम्ही पाकिस्तानसोबतच्या मालिकेबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे अर्ज सादर केलेला असून शासनाच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सरकारकडून उत्तर मिळाल्यानंतर आम्ही त्याबाबत माहिती कळवू. - राजीव शुक्ला