शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाची कोरियावर मात

By admin | Updated: June 15, 2016 05:20 IST

एस. व्ही. सुनील आणि निकीन तिमय्या यांनी नोंदविलेल्या गोलमुळे एशियाडच्या सुवर्णविजेत्या भारतीय संघाने कोरियाचे कडवे आव्हान मोडीत काढून मंगळवारी २-१ ने विजयासह एफआयएच

लंडन : एस. व्ही. सुनील आणि निकीन तिमय्या यांनी नोंदविलेल्या गोलमुळे एशियाडच्या सुवर्णविजेत्या भारतीय संघाने कोरियाचे कडवे आव्हान मोडीत काढून मंगळवारी २-१ ने विजयासह एफआयएच चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे आगेकूच केली आहे.चार सामन्यांत भारताचा हा दुसरा विजय असून, सात गुणांसह तो दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे कोरियाचा चार सामन्यांतील हा तिसरा पराभव होता. कोरियाचा संघ फायनलच्या चढाओढीतून बाहेर पडला. कोरियाच्या खात्यात तीन गुण आहेत. भारताच्या शानदार विजयात सुनीलने ३९व्या आणि तिमय्याने ५७व्या मिनिटाला गोल केला. कोरियाकडून एकमेव गोल किम जुहून याने ५७व्या मिनिटालाच केला. फायनलच्या चढाओढीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे आवश्यक होते. मागच्या सामन्यात बेल्जियमने भारताला २-१ ने पराभूत केले होते; पण कोरियाविरुद्ध साजरा केलेला विजय विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी संजीवनी ठरणार आहे. आजच्या सामन्यात आशियातील दोन्ही संघ पहिल्या दोन्ही क्वार्टरमध्ये एकमेकांची बचाव फळी भेदण्यासाठी डावपेच आखत राहिले. अखेर मनप्रीतने सुनीलला डी मध्ये पास दिला व त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळी भेदून गोल केला. तिसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताला एकूण तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले; पण ते तिन्ही वाया गेले. ५७व्या मिनिटाला भारताची बचाव फळी भेदून किमने गोल करताच बरोबरी झाली. पण, पुढच्याच क्षणी तिमय्याने गोल नोंदवून संघाला पुन्हा आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दोन मिनिटांत आकाशदीपकडे चांगली संधी होती; पण संधीचे सोने करण्यात तो चुकल्याने भारताची आघाडी २-१ अशीच राहिली.(वृत्तसंस्था)