शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
2
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
6
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
7
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
8
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
9
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
10
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
11
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
12
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
13
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
14
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
15
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
16
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
17
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
18
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
19
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
20
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

साहा, अश्विन मालिकेचे मानकरी

By admin | Published: August 24, 2016 4:17 AM

रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.

पोर्ट आॅफ स्पेन : रिद्धिमन साहा आणि रविचंद्रन अश्विन हे वेस्ट इंडिजविरुद्ध २-० ने मिळवलेल्या मालिकेचे फलित असल्याचे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे. यष्टिरक्षक साहा याने तळाच्या फळीत चांगली फलंदाजी केली. कोहली म्हणाला, ‘आमच्यासाठी हा चांगला दौरा ठरला. आम्ही काही विभागात सुधारणा करण्याच्या उद्देशाने आलो होतो आणि त्यात आम्ही यशस्वी ठरलो. तळाच्या फळीत खेळताना रिद्धिमान साहाची फलंदाजी व सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अश्विनने दिलेले योगदान माझ्या दृष्टीने या मालिकेतील सकारात्मक बाब आहे.’कोहली म्हणाला, ‘आम्ही कामगिरीत आणखी सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहोत. भविष्यातही त्यात खंड पडणार नाही, अशी आशा आहे. कसोटी क्रिकेटमध्ये या बाबी अधिक महत्त्वाच्या आहेत. तळाच्या फळीकडून उल्लेखनीय योगदान मिळाले म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये संघ यशस्वी ठरतात. त्यामुळे या विभागात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.’ मालिकेत चांगल्या निकालाची अपेक्षा होती : अश्विनरविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन शतके ठोकताना १७ बळीही घेतले. अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. अश्विनला या मालिकेत यापेक्षा सरस निकालाची अपेक्षा होती. अश्विनने या मालिकेत दोन शतकाच्या मदतीने २३५ धावा फटकावल्या. डावात दोनदा पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेताना एकूण १७ विकेट घेतल्या. अश्विन कसोटी मालिकेत सहाव्यांदा मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. सामनावीर पुरस्काराच्या शर्यतीत त्याने वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला. अश्विन म्हणाला, ‘यासाठी विंडीजला थोडे श्रेय द्यावे लागले. भारताची आघाडीची फळी लवकर माघारी परतल्यामुळे मला शतक झळकावण्याची संधी व वेळ मिळाला. अनेक संघातील आघाडीचे खेळाडू शतके झळकावतात.’ >एका कसोटीने आकलन होणार नाहीजर पाकिस्तान जिंकला नसता आणि आमची यापूर्वीची लढत अनिर्णीत संपली असती तर क्रमवारीत फरक पडला असता. हे अल्प कालावधीसाठी आहे, याची कल्पना आहे. क्रमवारीत चांगली चुरस आहे. संघ म्हणून या मोसमानंतर आकलन करणार आहोत. केवळ एका कसोटीवरून संघाचे आकलन करता येणार नाही. - कोहली >सहाव्या क्रमांकावरील फलंदाजी स्वप्नवत‘मी कसोटी सामन्यात चांगली गोलंदाजी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. वैयक्तिक विचार करता शतकाच्या तुलनेत मला पाच बळी घेण्याचा आनंद अधिक मिळतो. कोलकाता आणि सेंट ल्युसिया येथे झळकावलेली शतके माझ्यासाठी अधिक महत्त्वाची आहेत. मला या कामगिरीची अपेक्षा होती. दोन शतके ठोकण्यात यशस्वी ठरेल असे वाटत नसले तरी फलंदाजीमध्ये योगदान देणे महत्त्वाचे आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल, याची कल्पना नव्हती. मायदेशात दीड महिना कसून मेहनत घेतली. त्याचा लाभ झाला. - अश्विन