शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदासाठी अर्ज

By admin | Updated: June 6, 2016 19:34 IST

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कप्तान रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केल्याचे सुत्रांकडून समजते.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी माजी कप्तान रवी शास्त्री यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) अर्ज केल्याचे सुत्रांकडून समजते. 
गेल्या काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार टीम इंडियाचे संचालकपद सांभाळलेल्या रवी शास्त्री यांनी आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठीही अर्ज दाखल केला आहे. रवी शास्त्री यांच्याआधी निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनीही या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. 
बीसीसीआयने बुधवारी संध्याकाळी जाहिरात आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. विशेष म्हणजे यावेळी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज करताना नऊ प्रमुख अटी देखील टाकल्या आहेत. त्यातील प्रमुख अट अशी आहे की, अर्जदाराने आयसीसी सदस्य राष्ट्रीय संघ, प्रथम श्रेणी क्रिकेट संघ किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संघाचे यशस्वी प्रशिक्षकपद भूषविले असले पाहिजे. तसेच, इंग्रजी भाषेसह हिंदी आणि इतर भाषा बोलता येणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यासाठी येत्या 10 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन बीसीसीआयने केले आहे.  
टीम इंडियाचे मार्गदर्शन रवि शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचा करार मार्च महिन्यात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात आला. दरम्यान, बांगर यांना आगामी झिम्बाब्वे दौ-यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवडले आहे.