शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे भारत - ऑस्ट्रेलिया वन डे रद्द

By admin | Updated: January 26, 2015 15:12 IST

तिरंगी मालिकेत सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यावर पावसाने पाणी फेरले. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे.

ऑनलाइन लोकमत 

सिडनी, दि. २६ - तिरंगी मालिकेत सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यावर पावसाने पाणी फेरले. मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला असून दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी दोन गुण जमा झाले आहेत. आता शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताची करो अथवा मरो अशी स्थिती झाली आहे. 
 
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या तिरंगी मालिका सुरु असून यात ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली आहे. इंग्लंडने आत्तापर्यंत फक्त भारताचा पराभव केला आहे. तर भारताने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही. सोमवारी सिडनीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यात होता. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक होते. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात झाली. सामना सुरु झाल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने खेळ थांबवावा लागला. मात्र पावसाने काही वेळातच विश्रांती घेतल्याने सामना पुन्हा सुरु झाला. हा सामना ५० ऐवजी ४४ षटकांचा खेळवण्याचा निर्णयही घेतला गेला. सामना सुरु होताच सलामीवीर शिखर धवन स्वस्तात तंबूत परतला. तो अवघ्या ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर अंबाटी रायडू २३ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था २ बाद ६२ अशी झाली. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १६ षटकांत २ गडी गमावत ६९ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा नाबाद २८ आणि विराट कोहली नाबाद ३ धावांवर खेळत होता. तासाभरानंतरही पाऊस थांबत नसल्याने हा सामना रद्द करण्यात आला. 
शुक्रवारी भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. इंग्लंडच्या खात्यात पाच गूण असून भारताच्या खात्यात दोन गूण आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळाल्यास भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकेल.