शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माझी स्पर्धा स्वत:शीच आहे

By admin | Updated: March 3, 2017 00:33 IST

संघात स्थान मिळविण्यासाठी मला कोणाविरुद्ध स्पर्धा करावी लागेल, याचा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधीच विचार केला नाही.

नवी दिल्ली : संघात स्थान मिळविण्यासाठी मला कोणाविरुद्ध स्पर्धा करावी लागेल, याचा मी माझ्या कारकिर्दीमध्ये कधीच विचार केला नाही. जर हाच विचार कायम करत राहिलात, तर एक खेळाडू म्हणून तुम्ही कधीच प्रगती करू शकणार नाही. माझी स्पर्धा स्वत:शीच असून ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत, अशा गोष्टींचा मी विचार करीत नाही,’ असे वक्तव्य भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्माने केले.दुखापतीमुळे गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर विजय हजारे आंतरराज्य एकदिवसीय स्पर्धेतून रोहित पुनरागमन करीत आहे. रोहितचे मुख्य लक्ष्य टीम इंडियात पुनरागमनाचे असले, तरी सध्या त्याला आपलाच मुंबईकर सहकारी अजिंक्य रहाणे आणि कर्नाटकाच्या करुण नायरविरुद्ध कडवी टक्कर मिळणार आहे. रोहितने आपल्या मागील ३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांमध्ये नाबाद ६८, ८२ आणि नाबाद ५१ धावा अशा खेळी केल्या आहेत. आगामी ४ आणि ६ मार्च रोजी होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत रोहित मुंबईकडून खेळताना आपली तंदुरुस्ती सिद्ध करेल. त्याने सांगितले, की सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेमध्ये मी भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. मात्र, यासाठी पुन्हा एकदा मला नव्याने सुरुवात करावी लागेल.’’ त्याचप्रमाणे, ‘मी स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे अनुभवत आहे. मात्र, असे असले, तरी नेहमी काही चेंडूंना सामोरे जाणे आवश्यक असते आणि त्यानंतरच पुढे जाणे योग्य ठरते,’ असेही रोहितने सांगितले. (वृत्तसंस्था)एकीकडे राष्ट्रीय संघ पारंपरिक लाल चेंडूने खेळत असताना दुसरीकडे रोहित सफेत चेंडूने खेळत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे रोहितपुढे आव्हान ठरेल. मात्र, रोहितने बंगळुरू येथील एनसीएमधील नेट सरावादरम्यान एक दिवस लाल आणि त्यानंतर सफेत चेंडूने कसून सराव केला. याविषयी रोहित म्हणाला, ‘‘हे सोपे नव्हते; परंतु सराव संतुलित ठेवण्यासाठी मी दोन्ही चेंडूंनी सराव केला. दोन्ही चेंडूंनी सराव करताना वेगळा अनुभव आला.’’मी फलंदाज म्हणून मुंबईच्या डावाची सुरुवात करेन; मात्र कर्णधाराची भूमिका नाही बाजवणार. आदित्य तरेने पूर्ण मोसमात कर्णधार म्हणून शानदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर, मोठ्या कालावधीनंतर मी मुंबईकडून खेळण्यासाठी पुनरागमन करणार आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व करणे योग्य ठरणार नाही. सध्या मुंबईला दोन्ही सामन्यांत विजय मिळविणे आवश्यक असून तेच माझे मुख्य लक्ष्य आहे. चांगली खेळी करून मुंबईला विजयी करण्याचा माझा निर्धार आहे.- रोहित शर्माआपल्या पुनरागमनाविषयी रोहित पुढे म्हणाला, ‘‘संघात पुनरागमनाबाबत उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यास मी मानसिकरीत्या सज्ज आहे. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही गोष्टींची चिंताही आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी योग्य पुनर्वसन प्रक्रियेचा अवलंब केल्यास साडेतीन-चार महिन्यांत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात येऊ शकतो, असा विश्वास दिला. असे असले, तरी हा काळ सर्वांत कठीण काळ असतो. कारण यादरम्यान आपल्याला आपल्या सर्वांत आवडत्या गोष्टी करता येत नाहीत.’’