शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तर मालिका होणे कठीणच : शहरयार

By admin | Updated: December 12, 2015 00:14 IST

भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.

कराची : भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका पुढील महिन्यात जानेवारीत न झाल्यास वर्षभरात ही मालिका होणे कठीण असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी व्यक्त केले आहे.शहरयार म्हणाले, ‘‘उभय संघांना वर्षभर भरगच्च क्रिकेट खेळायचे असल्याने ही मालिका वेळेत न झाल्यास ती वर्षभर होऊ शकेल, असे मला वाटत नाही. भारतासोबत द्विपक्षीय मालिकेचे आयोजन आणि टी-२० विश्वचषकात पाकचा सहभाग या दोन्ही बाबी भिन्न आहेत. टी-२० आयसीसीची स्पर्धा असल्याने संघ खेळायला पाठविण्यासाठी पीसीबीला सरकारची परवानगी घ्यावी लागेल. आम्ही स्थितीवर नजर ठेवून आहोत. भारतात पाक संघ पाठवायचा झाल्यास सरकारकडून परवानगी घेतल्यानंतरच खेळणे शक्य होईल.’’श्रीलंकेत लहान मालिका खेळण्याबाबत भारत सरकारने संघाला अद्याप परवानगी बहाल केली नसल्याबद्दल शहरयार निराश दिसले. ते म्हणाले, ‘‘मालिका अयोजनाबद्दल माझ्या प्रयत्नांवर काही जण टीका करीत असल्याची मला जाणीव आहे. पण ही मालिका झाली किंवा नाही तरी भारताने उभय बोर्डात झालेल्या समझोत्याचा सन्मान राखायला हवा, असे माझे मत आहे.’’ भारताने मालिका न खेळल्यास पाकला आर्थिक फटका बसेल, मात्र आम्ही दिवाळखोरीत निघणार नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पीसीबीची आर्थिक स्थिती चांगलीच आहे. मालिका न झाल्यास काही अडचण जाणवेल, पण आम्ही आर्थिक डबघाईस आलो असे कुणी समजू नये. भारताविरुद्ध मालिका आयोजनाची आशा सोडलेली नाही. मालिका लवकर व्हावी, ही पीसीबीची इच्छा आहे. आम्ही आणखी काही दिवस भारताच्या होकाराची वाट पाहू.’’ ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क हे यासंदर्भात मध्यस्थाची भूमिका बाजावत असल्याचे शहरयार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)