शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

बाराबती मैदान दहा वर्षांत भारतासाठी ‘लकी’

By admin | Updated: January 18, 2017 04:18 IST

भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांत कुठले मैदान सर्वांत ‘लकी’ ठरले असेल तर ते आहे कटकचे बाराबती स्टेडियम.

कटक : भारतीय संघासाठी गेल्या दहा वर्षांत कुठले मैदान सर्वांत ‘लकी’ ठरले असेल तर ते आहे कटकचे बाराबती स्टेडियम. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध मैदानावर उद्या, गुरुवारी दुसरा वन-डे सामना खेळायचा आहे. गेल्या दहा वर्षांत भारताने बाराबती स्टेडियममध्ये खेळलेल्या पाचही वन-डे सामन्यांत विजय मिळविला आहे. त्यापैकी एक लढत भारताने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. त्यात भारताने ६ गडी राखून सरशी साधली होती. गेल्या दहा वर्षांत बाराबती असे एकमेव स्टेडियम आहे, की जेथे भारताने पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले आणि सर्वच सामन्यांत विजय मिळविला. या स्टेडियममध्ये भारताला अखेरचा पराभव नोव्हेंबर २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्वीकारावा लागला होता. सध्याच्या संघातील केवळ एक सदस्य युवराजसिंग त्या लढतीत खेळला होता. त्यानंतर भारताने या मैदानावर वेस्ट इंडिज व श्रीलंका या संघांविरुद्ध प्रत्येकी दोनदा, तर इंग्लंडचा एकदा पराभव केला आहे. दरम्यान, आॅस्ट्रेलियाविरुद्धची एक लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करावी लागली होती. गेल्या दहा वर्षांत भारताने सर्वाधिक १२-१२ सामने आरपीएस कोलंबो आणि दाम्बुला येथे खेळले आहेत. कोलंबोमध्ये भारताने नऊ सामने जिंकले, तर तीन सामने गमावले. दाम्बुलामध्ये सात सामन्यांत विजय मिळविला, तर पाच सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, हरारे स्पोर्टस् क्लबवर भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. तेथे खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांपैकी नऊ सामन्यांत विजय मिळविला, तर दोन सामने गमवावे लागले. पोर्ट आॅफ स्पेनमध्ये आठपैकी सहा सामने जिंंकले, तर दोन सामने गमावले.भारतीय मैदानाचा विचार करता या कालावधीत भारताने बाराबतीव्यतिरिक्त दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियममध्येही पाच सामने जिंंकले, पण दरम्यान एक लढत गमावली. एका लढतीचा निकाल शक्य झाला नाही. भारताने या कालावधीत बंगलोर, चेन्नई, मोहाली आणि विशाखापट्टणम येथेही पाच किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळले; पण प्रत्येकी चार सामन्यांत विजय मिळविता आला. बाराबतीमध्ये भारताने एकूण १५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ११ सामने जिंंकले, तर चार सामने गमावले. इंग्लंडने येथे पाच वन-डे सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामन्यांत त्यांनी विजय मिळविला. त्यात १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या नेहरू कप लढतीचाही समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान या मैदानावर आतापर्यंत चार सामने खेळले गेले आणि कामगिरी २-२ अशी आहे. अजिंंक्य रहाणे व शिखर धवन यांनी येथे यापूर्वी खेळल्या गेलेल्या लढतीत शतके झळकाविली होती. श्रीलंकेविरुद्ध नोव्हेंबर २०१४ मध्ये येथे खेळल्या गेलेल्या लढतीत रहाणे (१११) व धवन (११३) यांनी चमकदार कामगिरी करताना सलामीला २३१ धावांची भागीदारी केली होती. भारताने त्यावेळी ५ बाद ३६३ धावांची मजल मारली होती. या मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्या खेळीपासून प्रेरणा घेत धवन फॉर्मात येण्यासाठी प्रयत्नशील राहील. या डावखुऱ्या फलंदाजाने पुणे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे सामन्यात केवळ एक धाव केली होती. (वृत्तसंस्था)>दुसऱ्या वन-डे पूर्वी दव ठरले चिंतेचे कारणपुणेमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत तीन गडी राखून विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला असला तरी १९ जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत ‘दव’ हा घटक चिंतेचे कारण ठरणार आहे. बुधवारी भारतीय संघ येथे दाखल होईल त्यावेळी संघव्यवस्थापन याबाबत नक्की विचार करेल. स्थानिक क्युरेटरच्या मते दव सायंकाळी ५.३० नंतर पडण्यास सुरुवात होते. सामन्याच्या दिवशीही असेच घडले तर नाणेफेक जिंंकून फलंदाजी करणाऱ्या संघासाठी लाभदायक ठरू शकते. क्युरेटर पंकज पटनायक म्हणाले, ‘गेल्या काही दिवसांमध्ये बरेच दव पडत आहे. रासायनिक स्पे्र, दोन सुपर सोपर आणि दोर याद्वारे दवाचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू. मैदानावरील हिरवळ आठ मिलिमीटर वरून सहा मिलिमीटरपर्यंत कापण्यात आली आहे. त्यामुळे दवबिंदू मातीत मुरण्यास मदत होईल. यापूर्वी या मैदानावर २०१४ मध्ये सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात भारताने सरशी साधली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पुणे येथे पहिल्या वन-डेमध्ये इंग्लंडने दिलेल्या ३५१ धावांचे लक्ष्य ७ गड्यांच्या मोबदल्यात ११ चेंडू राखून पूर्ण केले. दुसऱ्या लढतही मोठ्या धावसंख्येची होईल, अशी आशा आहे. क्युरेटर म्हणाले, ‘माझ्यासाठी धावांबाबत भाकीत करणे कठीण आहे, पण नेहमीप्रमाणे यावेळीही येथे मोठी धावसंख्या उभारली जाईल. खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असून फलंदाजांनी त्याचा लाभ घ्यावा.’ उभय संघ बुधवारी येथे पोहोचणार असून सायंकाळच्या सत्रात सराव करतील. मालिकेतील तिसरा व अखेरचा वन-डे सामना २२ जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळल्या जाणार आहे.